सशस्त्र सेना भरती पूर्व व नव-उद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वेकंटेश्वरा फार्म वेल्फेअर फाउंडेशन आणि वेकंटेश्वरा कॉपरेटिव्ह पॉवर अॅन्ड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने, नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावात “वेकंटेश्वरा अग्निवीर, सशस्त्र सेना भरतीपूर्व व नव-उद्योग प्रशिक्षण” केंद्र सुरू होत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यातील मालोगाव जवळच्या वेकंटेश्वरा अॅग्रो फार्म,अंजंग येथे झाले आहे. नाशिक येथील कैलास मठाचे परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वतीजी, माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, नाशिक पोलीस पैरीक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या केंद्राच्या माध्यमातून युवकांना भारतीय सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण तसेच नवउद्योगासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे. व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड चे चेअरमन तथा व्यवस्थापकी अध्यक्ष (Ex-Army – Black Cat कमांडो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये गौरविलेल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांनी गौरविलेल्या माजी सैनिक शिवाजीराव डोळे तसेच वेल्फेअर फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.मुक्ता डोळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाला तरुण सैनिकी बळ प्राप्त व्हावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांशी अग्नी वीर योजनेत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील होतकरू बेरोजगार तरुण-तरुणींना सामील होणे सहजसुलभ व्हावे तसेच सैन्य दलाव्यतिरिक्त विशेषता शेती क्षेत्रावर आधारित स्वतःच्या उद्योग व्यवसाय काढण्याच्या बाबतीत तरुणांना प्रशिक्षित करून बेरोजगारीवर मात करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण केंद्राचे कार्य चालणार असून सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर नवयुवक युवती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहतील आणि देशाची ही सेवा करतील असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव डोळे यांचे म्हणणे आहे.
अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण संस्था हजारो रुपयांचे शुल्क आकारतात ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील तरुण-तरुणींना त्यामुळे हे प्रशिक्षण घेता येत नाही म्हणून सहा महिन्याचे हे सर्व प्रशिक्षण भोजन निवासासह मोफत दिले जाणार आहे स्वामी सविदानंद सरस्वती आणि मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वजाच्या स्तंभाचे आणि माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना स्वामी संविदानंद सरस्वती म्हणाले की भारत पूर्वी जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा अशी ख्याती असणारा समृद्ध देश होता आजही आहे आणि उद्याही असेल देशातील तरुणांवर संस्काराच्या अमूल्य ठेवा असला तर संस्कार असतील तर अहंकार येणार नाही भारतावर सध्या असलेले अतिरेक्यांचे संकट हे टाळण्यासाठी शक्तिशाली होणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डोळे म्हणाले की ग्रामीण भागातील अशिक्षित आई-वडिलांनी अर्धपोटी राहून तरुणांना शिक्षित केले आहे परंतु त्यांना जर रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर या तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडेल या अग्निवीर प्रशिक्षणातून सहभाग घेणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीला उदरनिर्वाहासाठी उपजीविकेचे साधन निर्माण होईल असे आश्वासन आपण देत असल्याचे डोळे यांनी सांगितले प्रशिक्षण केंद्रात भरती होणाऱ्या तरुण-तरुणींचे आयुष्यातील सहा महिने व्यर्थ जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पद्मश्री विकास महात्मे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रताप दिखावकर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.
ज्या मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये हे प्रशिक्षण केंद्र कार्य करणार आहे त्या मालेगाव आजूबाजूच्या सटाणा देवळा कळवण या कसमादे नावाने परिचित असलेल्या भागातील सैन्यात भरती होणारे तरुण-तरुणी पैकी कोणी ना कोणी सैन्य दलामध्ये मध्ये सर्वोच्च पदी विराजमान झाले पाहिजे इतक्या मेहनतीने हे प्रशिक्षण तरुणांनी घ्यावे असे ते म्हणाले कर्तुत्वान तरुणांनी मनातील हरण्याची भीती काढून टाकावी असे त्यांनी सांगितले