सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श व्यक्तीमत्व देवाजीबापू
डाक विभाग भारत सरकार तर्फे स्पेशल कव्हर अनावरण संपन्न

चांदा ब्लास्ट
श्रीमंत देवाजीबापू खोब्रागडे शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिती चंद्रपूर व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरिअल मल्टीपरपज सोसायटी चंद्रपूर च्या विद्यमाने देवाजीबापू खोब्रागडे यांची १२५ वा जयंती महोत्सव प्रियदर्शनी सभागृहात डाक विभाग भारत सरकार तर्फे स्पेशल कव्हर चे अनावरण सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम श्रीमंत देवजीबापू खोब्रागडे यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत सभागृहात दाखविण्यात आली, अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांनी देवाजिबापू यांच्या जीवनावर मार्गदर्शन करत डाक विभाग भारत सरकार चे विशेष आभार व्यक्त केले.पोस्ट मास्टर जनरल विदर्भ क्षेत्र नागपूर मा.शोभा मधाळे यांनी स्पेशल कव्हर चा प्रथम एल्बम देवजीबापू खोब्रागडे यांचे सून सुधा हेमचंद्र खोब्रागडे यांना सुपूर्द करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण केले, माजी मंत्री आ.डॉ नितीन राऊत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्यात स्वतः ला वाहून घेत सर्वस्व अर्पण करणारे पैकाबई, देवाजीबापू,
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि संपूर्ण खोब्रागडे कुटुंब भारतात एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले आ.किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथे देवाजीबापू खोब्रागडे यांचे स्मरण युवा पिढीला व्हावे याकरिता वास्तू शिल्प उभारणार असल्याचे जाहीर केले.मंचावर स्वागाध्यक्ष मारोतराव पत्रुजी खोब्रागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रास्ताविक प्रतीक डोर्लीकर आभार ॲड.राजस खोब्रागडे संचालन निवेदिता पुनवटकर यांनी केले यानंतर भव्य प्रबोधन सभा रिपब्लिकन नेते अशोक निमगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या प्रसंगी राज्याचे विरोधीपक्ष नेते ना विजय वेट्टीवार यांनी ज्या चांदा – ब्रम्हपुरी क्षेत्रातून देवाजीबापू आमदार होते त्याच क्षेत्रातून मी स्वतः प्रतिनिधित्व करीत असल्याचा अभिमान आहे असे मत व्यक्त करत या १२५ व्या जयंती समारंभ निमित्त भारतातील लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्याकरता एकजुटीने संकल्प करण्याचे उपस्थितांना आव्हान केले.मुख्य वक्ते तथा जेष्ठ पत्रकार प्रा.रणजित मेश्राम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा श्रीमंत देवाजीबापू आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे या दोन्ही पिता पुत्रांना जो सहवास लाभला तो भारतातील इतर कोणत्याही कुटुंबाला लाभला नसल्याचे अधोरेखित केले तसेच भारतात लोकशाही अबाधित राहावी असे वाटत असेल धार्मिक मूल्यावर नव्हे तर संविधानिक मूल्यावर भारताची वाटचाल होणे गरजेचे असल्याचे मनोगतून सांगितले.यावेळी मंचावर ॲड.रामभाऊ मेश्राम, जेष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांची उपस्थिती होती.या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते देवाजीबापू खोब्रागडे यांच्या जीवनपाटावर डॉ विद्याधर बनसोड लिखित माहितीपट प्रकाशित करण्यात आले,चित्रफितीला मृणाल कांबळे यांनी संवाद करून अवाज दीला होता,सर्व उपस्थीत मान्यवरांचे समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धाकृती प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक किशोर सावाने संचालन प्रेमदास बोरकर यांनी तर उपस्थितांचे आभार यशवंत मुंजमकर यांनी मानले. देवजीबापू खोब्रागडे यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा ब्ल्यू मिशन मल्टिपरपज सोसायटी चंद्रपूर च्या सौजन्याने घेण्यात आली विजेत्यांचे बक्षिक वितरण सुद्धा या प्रसंगी करण्यात आले.
या प्रसंगी नंदू नगरकर, सूर्यकांत खनके, पप्पू देशमुख, अवतारसींग गोत्रा, विशाल अलोने, बलराम डोडाणी, राजूभाऊ खोब्रागडे, हाजी अनवर अली, विजय नळे, रमजान अली, ॲड. आशिष मुधडा, धर्मेश नीकोसे, एम.ती. साव, संजय डुंबरे, राजकुमार जवादे, जी.के.उपरे, अशोक टेभरे, भाऊराव दुर्योधन, आर्की.राजेश रंगारी, सिद्धार्थ शेंडे, हरिदास देवगडे, पुरानसिंग जुणेजा, दुष्यंत नगराळे, वसंत रंगारी, शाहीन शेख, द्रौपदी काटकर, ज्योती साहारे, गीता रामटेके, मृणाल कांबळे, निर्मला नगराळे, अनीता जोगे, छाया थोरात, ज्योती शिवणकर, अल्का मोटघरे, पंचफुला वेल्हेकर, प्रेरणा करमरकर, वैशाली साठे, सुनीता बेताल, अश्विनी आवळे, लीना खोब्रागडे, वर्षा घडसे, समता खोब्रागडे, पौर्णिमा गोंगले, महादेव कांबळे, विजय करमरकर, सचिन पाटील, शंकर वेल्हेकर, जमनादास मोटघरे, अशोक सागोरे, अशोक फुलझेले, अनिल आलोने, कैलाश शेंडे, सुनील जूनघरे, विशाल चीवंडे, हर्षल खोब्रागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.