संमतिपत्रांवर वारसांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे द्या
ब्रह्मपुरी भाजपाच्या शिष्टमंडळाचे न.प मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी : प्रधानमंत्री आवास योजना (शहर) अंतर्गत घरकुलाचा लाभा करिता मालकीची जमीन नसल्यामुळे अनेक गरजू या पासून वंचित राहतात. या संदर्भात गरजू नागरिकांनी योग्य असे संमतीपत्र सादर केल्यास त्यांना घरकुलाचा देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना करण्यात आली.
ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवदेन देऊन या संदर्भात मागणी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज वठे, माजी नगरसेवक तथा महामंत्री मनोज भूपाल, जिल्हा सचिव साकेत भानारकर, माजी बांधकाम सभापती विलास विखार, पवन जयस्वाल, सुरेश दर्वे उपस्थित होते.
ब्रह्मपुरी नगर परिषद हद्दीतील अनेक गरजू लोकांची स्वतःच्या मालकीची जमीन नसून ते घरकुल लाभापासून वंचित आहेत. संमतीपत्रावर नगर परिषदेच्या वतीने घरकुल दिल्यास ब्रह्मपुरी शहरातील शेकडो परिवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.