Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कैलास अर्जुनराव नागरे यांचे पाण्याच्या भूमिकेवर ठाम राहत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर डीडी न्यूज च्या दिलेल्या पहिल्या मुलाखतीत सर्वसामान्य नागरिक औद्यगिक शेतकरी हितावह नदीजोड प्रकल्पाची घोषणाची उद्धपातलीवर ध्येय धोरणे आखत तात्काळ अंमलबजावणी ही मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदार संघातील आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत राष्ट्र माता राज माता जिजाऊचां तालुका सिंदखेड राजा आणि राजे जाधव व संत चोखामेळा महाराज आणि श्री बालाजी मंदिर चे वैभव असलेला मराठवाडा सीमेलगत असेलेला तालुका देऊळगाव राजा या तालुक्यातून वाहणारी सर्वात मोठी जल वाहिनी खडकपूर्णा नदी चे पाणी देऊळगाव राजा तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त असलेल्या अंढेरा,सेवानगर,आसोला, गुंजाळ,बायगाव,मेंडगाव,शिवणी आरमाळ,सावखेड नागरे,पाडली शिंदे,धोत्रा नदई ,सूरा नागनगाव,वागद आदी गावातून वाहणाऱ्या आणि अंचरवाडी,अंढेरा,असोलां,मेरा शिवारातून उगम पावणाऱ्या हंगामी नद्यांना श्री संत चोखामेळा सागरच्या डाव्या कालव्याद्वारे किंवा नवीन काल्वा निर्मिती करून किंवा काय कसे पाणी आणायचे ते आणून आपण नदीजोड प्रकल्पाची केलेल्या शेतकरी हितावह घोषणेची युद्ध पातळीवर ध्येय धोरणे आखत तात्काळ अंमलबजावणी भागात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात शुभारंभाचा नारळ आपल्या हस्ते फोडून करावी

आणि आपण खडकपूर्णाचे नदीचे पाणी जरी या भागतील नद्यांना जोडले तरी ते परत या नद्यांचा शेवट किंवा त्या नदया या देऊळगाव राजा तालुक्यातील पाडली शिंदे, सिंदखेड राजा तालुक्यातील वागद मार्गे तढेगाव शिवारातून परत खडकपुर्णा नदीला जाऊन मिळतात समाविष्ट होतात आणि ते पाणी परत खकपूर्णा नदीत मिसळते/समाविष्ट होते.

      पण हे पाणी वरील गावांच्या नद्यांना जर आपण जोडले तर हा दुष्काळ ग्रस्त भौगलिकदृष्ट्या अवर्षन ग्रस्त भागात या परिसरात हरितक्रांती सोबतच औदियगिक क्रांती एकाच हंगामात नक्कीच घडून येईल आणि परिसरातील 20 ते 25 गावे आणि त्यांचा हजारो हेक्टर परिसर सुजलाम् सुफलाम् होत आर्थिक दृष्ट्या सक्षम नक्कीच होईल व परिसरातील शेतकरी शेतीत नाविण्यपूर्ण प्रयोग करत आणि इतर नागरिक विविध नवंनवीन उद्योग उभे करत विभागात राज्यात देशात विदेशात आदर्श निर्माण करतील

      आपण नदीजोड प्रकल्पाची केलेल्या शेतकरी हितावह घोषणेची उद्धपातलीवर ध्येय धोरणे आखत तात्काळ अंमलबजावणी ही या भागात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत शुभारंभाचा नारळ फोडून आपल्या हस्ते येणाऱ्या 14 डिसेंबर 2024 आत करावी अन्यथा 15 डिसेंबर पासुन अन्न त्याग आंदोलनं करण्याचा इशारा कैलास अर्जुनराव नागरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिला होता, त्यानुसार आज पासून कैलास नागरे यांनी अन्न त्याग आंदोलनं शिवणी आरमाळ धरण क्षेत्रात सकाळी 10.30 वाजता सुरू केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये