यशस्वी प्रकल्पासाठी योग्य नियोजन आवश्यक – राकेश रामटेके
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात ‘व्यवसाय व्यवस्थापनाचे तत्त्व’ विषयावर अतिथी व्याख्यान

चांदा ब्लास्ट
एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईचे, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर आवारात दिनांक ०२ एप्रिल २०२५ रोजी इंटेरिअर डिझाईन विभागात ‘व्यवसाय व्यवस्थापनाचे तत्त्व’ या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते एल.के.एम. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च कॉलेज, चंद्रपूर येथील डॉ. राकेश रामटेके होते.
व्याख्यानादरम्यान त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनातील नावीन्यपूर्ण तंत्र, उद्योजकता विकासाच्या संधी, वेळेचे नियोजन आणि प्रभावी प्रकल्प व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करताना कोणत्या रणनीती प्रभावी ठरतात, तसेच व्यवस्थापन कौशल्यांचा विकास कसा करावा, याविषयी त्यांनी मौलिक माहिती दिली. उद्योग क्षेत्रातील आधुनिक संकल्पना आणि स्टार्टअप्ससाठी आवश्यक धोरणांवरही त्यांनी विशेष भर दिला.
कार्यक्रमाला एसएनडीटी महिला विद्यापीठ बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले तसेच सहाय्यक कुलसचिव डॉ. बालू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अल्मस्त यांचे सहकार्य लाभले आणि विभागप्रमुख सहाय्यक प्राध्यापक अश्विनी वाणी विशेष परिश्रम घेतले तसेच सहाय्यक प्राध्यापक विवेक पाटील सहाय्यक प्राध्यापक अपेक्षा पिंपळे आणि यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबा खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन आतुफा बैग यांनी व्यक्त केले आणि साक्षी पुनेकरने या व्याख्यानाचा सारांश सादर केला.