राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काढली राज्य सरकारची प्रेतयात्रा
आंदोलन आणखी तीव्र करण्याकरिता आंदोलन करण्याचा इशारा - सचिन राजूरकर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, व इतर मागण्या घेऊन रवींद्र टोंगे या युवकाने 11 सप्टेंबर पासून उपोषण सुरू केले. टोंगेची हृदयगती, रक्तदाब आणि साखरेची पातळी खालावल्याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.दिनांक 22 सप्टेंबर उपोषण स्थळी विजयराव बलकी व प्रेमानंद जोगी यांनी अन्नत्याग करत उपोषण सूरू केले.असे असताना राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही किंवा आश्वासन दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याकरिता आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिला आहे.
चौदा दिवसांनंतरही राज्य शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ओबीसी समाजातर्फे सारकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा ऍड. दत्ता हजारे, ऍड. पुरुषोत्तम सातपुते,नंदू नागरकर, राजू बनकर यांनी तिरडी काढून केंद्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवर यांच्या निवासस्थानावर राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली.पोलिसांनी शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले सहीत रवींद्र शिंदे, दिनेश चोखारे,बबनराव फंड ,अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, राजेश नायडू,पप्पू देशमुख,कुणाल चहारे, महेश खंगार,प्राअनिल शिंदे, निलेश बेलखेडे,अनिल डहाके, राहूल चौधरी,गणेश आवारी ,पांडुरंग टोंगे,राजेश बेले,सचिन निंबाळकर, रंजित डवरे ,गोपाल अमृतकर, डॉ. किशोर जेणेकर, धनराज आस्वले, विलास माथणकर, सुनील वाढई, भालचंद्र दानव,पारस पिंपळकर,मनीष बोबडे,गोमती पाचभाई,मायताई ठावरी,कुसुम उदार,विद्याताई वडस्कार, मंजुषा मालेकर,देवा पाचभाई,गणेश झाडे,योगेश बोबडे, अक्षय येरगुडे,विनोद निब्रड,बाळा पिंपळशेंडे,अशोक उपरे,भाऊराव झाडे,भाविक येरगुडे,राहुल भोयर सहीत अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
या प्रतिकान्मक तिरडी नंतर प्रा सूर्यकांत खनके व सतीश मालेकर यांनी मुंडण करवून घेत राज्य सरकार चा जाहीर निषेध व्यक्त केला. कोड -२५ सप्टेंबरला सर्व तालुकास्थळी साखळी उपोषण आंदोलन व ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद करण्याचा निर्णय राष्ट्रिय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटनांनी व सर्व जातीय संघटना यांनी घेतला आहे.