Day: February 15, 2024
-
ग्रामीण वार्ता
प्रभारी ग्रामसेवकांनी केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे प्रभार काढण्यासाठी शुभांगी राऊत यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी जिवती :- तालुक्यातील ग्रामपंचायत टेकामांडवा येथील सध्याचे…
Read More » -
ग्रामीण वार्ता
बल्लारशा येथून मुंबई करिता दररोज नंदीग्राम एक्सप्रेस व पुणे करिता आठवडयातून ३ दिवस लवकरच रेल्वे धावणार – हंसराज अहीर
चांदा ब्लास्ट चंद्रपूर येथून मुंबई व पुणे करिता थेट रेल्वे नसल्याने जिल्हयातील अनेक विद्यार्थी – पालक व व्यापा-यांना ईतर पर्यायाचा अथवा नागपूर येथून रेल्वे प्रवास सुरू करावा लागत होता. चंद्रपूर येथून मुंबई व पुणे करिता थेट रेल्वे असावी अशी विविध स्तरावरून मागणी होत असतांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मागणीची गांभीर्याने दखल घेत दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत थेट बल्लारशा येथून मुंबई व पुणे करिता रेल्वे सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून रेल्वे विभागाने हंसराज अहीर यांच्या मागणीचे संदर्भ देत दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी यासंबंधीचे पत्र विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर यांना जारी करून रेल्वे सुरू करण्यासाठी व्यवहार्यता टिप्पणी (Feasibility remark) सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत. दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी हंसराज अहीर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत काझीपेठ पुणे ट्रेन न २२१५१/५२ बल्लारशा येथून सुरू करावी अशी मागणी केली होती. तसेच नंदीग्राम एक्सप्रेस ट्रेन नं. ११४०१/०२ ही मुंबई येथून आदिलाबाद पर्यंत येत असतांना या रेल्वेचे विस्तारीकरण करून बल्लारशा पर्यंत सुरू करावी या मागणीसह चर्चा केली. नंदीग्राम या रेल्वे च्या मार्गात भद्रावती, वणी, पिंपळखुटी या ठिकाणी थांबणार आहे. अहीर यांच्या या चर्चेला अनुसरून मध्य रेल्वे विभागाने सदर पत्र विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर यांना जारी केले आहे. या पत्रान्वये बल्लारशा येथून मुंबई करिता दररोज तर पुणे करिता आठवडयातून ३ दिवस रेल्वे धावणार आहे. मुंबई व पुणे करिता थेट रेल्वे सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चैतन्याचे वातावरण असून यात्रेकरूंसाठी ही रेल्वे विशेष सुविधेची ठरणारी आहे. याबाबत अधिक माहिती देत हंसराज अहीर यांनी सांगीतले की, सदर रेल्वे गाडया जलद गतीने सुरू करण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांच्याशी चर्चा केली असून त्वरीत व्यवहार्यता टिप्पणी मध्य रेल्वे मुंबई कार्यालयास सादर करण्याची सुचना केली आहे. या रेल्वे सुरू होत असतांना चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील प्रवाशी, विद्यार्थी, पालक, व्यापारी व यात्रेकरू यांना भरिव फायदा होणार असून हंसराज अहीर यांचे हे प्रयत्न चंद्रपूर जिल्हयातील रेल्वे सुविधेमध्ये नक्कीच मैलाचा दगड ठरेल असा सार्थ विश्वास चंद्रपूर रेल्वे संघर्ष समितीच्या वतिने व्यक्त करून हंसराज अहीर यांचे आभार मानले आहे.
Read More » -
ग्रामीण वार्ता
विद्यार्थ्यांनी शिक्षणात वेगवेगळ्या संधीचा शोध घेणे गरजेचे – ॲड. दिपक चटप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे आयोजित कला व विज्ञान शाखेतील सत्र…
Read More » -
ग्रामीण वार्ता
वैध मापण शास्त्र विभागाकडून भद्रावती आठवडी बाजारात ११ दुकानदारावर कारवाई
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे शहरातील अनेक ठोक व चिल्लर दुकानदार, भाजी विक्रेते, मिठाई फरसाण विक्रेते यांच्या कडे असलेला वजन…
Read More » -
ग्रामीण वार्ता
४८ वर्षानंतर जगप्रसिध्द पैलवान पुन्हा उतरणार चंद्रपूरातील दंगलीत
चांदा ब्लास्ट १९७५ साली चंद्रपूरातील कोहिनूर तलावाच्या मैदानावर जगप्रसिद्ध पैलवान दारासिंग रंधावा आणि झिबिस्को यांची लढत झाली होती. त्यानंतर आता आमदार…
Read More » -
ग्रामीण वार्ता
कस्तुरबा कान्व्हेंटचे वार्षीक स्नेह सम्मेलन संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे शहरातील देऊळगाव राजा शिक्षण संस्था द्वारा संचालित कस्तूरबा कॉन्व्हेंट येथील वार्षीक स्नेह सम्मेलन नुकतेच संपन्न…
Read More » -
ताज्या घडामोडी
अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम महिला बचतगटांना देण्याची मागणी
चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र चोरडिया चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट पुर्वी महिला बचत गटांना…
Read More » -
ग्रामीण वार्ता
खडकपूर्णा प्रकल्पात अवैध वाळू उत्खनन सुरु
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असताना महसूल विभागाच्या पथकाने 13 फेब्रुवारी ला धाड…
Read More » -
ग्रामीण वार्ता
रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून १ देशी कट्टा व २ जीवंत काडतुस जप्त
चांदा ब्लास्ट चंद्रपुर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मा. श्री.…
Read More » -
ग्रामीण वार्ता
स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ त्या पाचही महान स्त्रीयांची संयुक्त जयंती साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे जयभीम महिला संघटन, भद्रावती यांनी डॉ. आंबेडकर चौक, भद्रावती येथे त्यागमुर्ती माता रमाई, पहिल्या मुस्लिम…
Read More »