ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सात वर्षापूर्वी उभारलेल्या वणी खु.गावतील मोबाईल टॉवर कुचकामी

गावात नेटवर्कच नाही मग गाव डिजिटल कसे होणार ; संबंधित विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

एकिकडे भारतातील संपूर्ण खेडे-गाव डिजिटल बनविण्यासाठी केंद्र सरकार मोठा गाजावाजा करीत आहे,तर दुसरीकडे माञ सात वर्षापूर्वी वणी(खु) या गावात जिओ टॉवर उभारण्यात आले मात्र त्या टॉवरचे नेटवर्क अजूनही चालू केले नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून तातडीने जिओ टॉवर चालू करून नागरिकांना सोयीचे करावे अशी मागणी गावकरी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

     जिवती तालुक्यातील वणी(खु) या गावात जिओ टाॅवर उभा करून सात वर्षाचा कालावधी झालेला आहे. सदर जिओ टाॅवरचा काम पूर्ण होऊनही संबंधित विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे अद्याप जिओ टाॅवरचा नेटवर्क चालू करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना व नागरीकांना ऑनलाईन कामासाठी ८ ते १० किलोमीटर अंतरावर नाईलाजाने सारखे जावे लागत आहे.

गावात ऑनलाईन कामासाठी उपयोगी अशी इतर कोणत्याच प्रकारच्या नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यी व नागरिकांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. ऑनलाईन कामासाठी सारखे-सारखे लांबच्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे पैसा खर्च होऊन वेळ वाया जात आहे. तरी सदर समस्या लक्षात घेऊन वणी(खु) येथील जिओचा उभारण्यात आलेला टाॅवर तात्काळ सुरू करण्यात यावा.अशी मागणी करण्यात येत आहे.

सध्या शासकीय सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. या सर्व कामांना दररोज अडथळा निर्माण होत आहे.हा अडथळा दूर व्हावा म्हणून वणी येथील जिओ टॉवर सुरू केल्यास गावात रेंजची परिपूर्ण सोय होईल व ऑनलाईन सुविधांपासून कोणीही वंचित राहणार नाही.

– पुंडलिक गिरमाजी,सरपंच ग्रामपंचायत पुडियालमोहदा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये