ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी अखेर उलगुलान संघटनेसमोर नरमले

आंदोलनापूर्वीच कामगारांच्या मागण्या केल्या मान्य

चांदा ब्लास्ट

वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी अखेर उलगुलान संघटनेसमोर नरमले, असून आंदोलनापूर्वीच कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आहे.मागील कित्येक वर्षांपासून कुणाल कंपनीत कंत्राटी कामगार काम करत आहेत.मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही,कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जाते.

याबाबत येत्या पाच सप्टेंबरला उलगुलान कामगार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार होते.दरम्यान वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी व्यवस्थापनाने उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व कामगारांना चर्चेसाठी बोलावले.कामगारांचे पीएफ खात्यात जमा करणे, कामगारांचे वेतन नियमित 10 तारखेला देणे व अन्य मागण्या बैठकीत मान्य करण्यात आल्या.या बैठकीत कामगारांच्या सर्व मागण्या कुणाल कंपनीने मान्य करुन लेखी पत्र सी एस टी पी एस च्ये उपमुख्य अधिकारी राठेर साहेब,महेश राजुरकर, वंजारी साहेब,कुणाल कंपनी च्ये ठेकेदार प्रतिनिधि कमलेश दास,केल्या असून उलगुलान संघटनेचे होणारे आंदोलन स्थगित झाले आहे.

आंदोलन जरी स्थगित करण्यात आले तरी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे,रवि पवार,गुरू भगत, कुणाल चौधरी, सुमित भिमटे, मंगेश बदकल, अक्षय राउत,अभय सपाट,शाम चुके,मोनू मटाले,प्रतीक मानकर, प्रफुल्ल सोनट्टके, प्रवीण मंडावी,सुधीर डाहाकी, आनंद पुणेकर,राजु जागने, प्रफुल्ल पाटिल राहुल वाभले यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये