शेतात जाण्याचे रस्त्यावरुन झालेल्या वादातुन मृतक व त्याचे पत्नीवर कुर्हाडीने वार
खुन/खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. व ४०००/-रु.दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा येथील मा. श्री. संजय भारुका सा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांनी आरोपी नामे अमोल अरुणराव देशमुख वय ३६ वर्ष रा.येसंभा, जि. वर्धा यांस१) कलम ३०२ भादवि मध्ये आजीवन कारावास शिक्षा व २०००/-रु. दंड न भरल्यास ०३ महीने साधा कारावास २) कलम ३०७ भादवि मध्ये १० वर्ष सश्रम कारावास व २०००/-रु. दंड न भरल्यास ०३ महीने साधा कारावासीची शिक्षा ठोठावण्यात आली.
याप्रमाणे यातील मृतक हा बैलगाडी घेवुन शेतात गेला होता दुपारी शेतात बंडी ठेवुन घरी जेवणास परत आला जेवन करुन पुन्हा शेतात कामावर गेला डवरणी करीत असता आरोपी हा मृतकचे शेतात आला फिर्यादी व मृतकला तुमचा जाण्या येण्याचा रस्ता नाही या कारणावरुन वाद करुन कुन्हाडीने डोक्यावर मारुन जिवानीशी ठार केले व फिर्यादीस जिवाने मारण्याचे उद्देशाने जखमी केले अशा फिर्यादीचे डी.डी.बयाणावरुन गुन्हा नोंद करुन प्रकरणाचा तपास तत्कालीन तपास अधिकारी पोउपनि/गजानन कंगाले व सपोनि बाबासाहेब थोरात, पो.स्टे. सेवाग्राम, यांनी केला व आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अप क्र. ३७७/१८ क ३०२,३०७ भादवि नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले.
सरकारतर्फे अतीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्रीमती वेदिका पाटील यांनी सदर प्रकरणात सरकार तर्फे एकुण १५ (पंधरा) साक्षीदार तपासले त्यांना पैरवी अधिकारी, सेवानिवृत्त सफौ/दिगांबर गांजरे व पोलीस हवालदार, जयेश डांगे, ब.नं.१२३२, पो.स्टे. सेवाग्राम यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मोलाची कामगरी बजावली. फिर्यादी व इतर सर्व साक्षदार, याची साक्ष ग्राह्य धरुन अत्तीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्रीमती वेदिका पाटील यांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून मा. श्री. संजय भारुका सा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांनी आरोपीस दिनांक २०/०४/२०२४ रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.