नागभीड येथील औद्योगिक विकास परिसरात जनावरे चरण्याचे ठिकाण…
रोजगार निर्मिती नाही, अनेक भूखंड ताब्यात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील महा राज्य औद्योगिक विकास परिसरात रोजगार निर्मिती व्हावी आणि तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यात औद्योगिक परिसर देण्यात आला मात्र गेल्या ५०वर्षात रोजगार निर्मितीसाठी उद्योग उभारणी होणे गरजेचे होते पण तसे झालेले दिसत नाही. नागभीड येथे अनेक भूखंड देण्यात आले परंतु उद्योग उभारणी न झाल्याने रिकामे पडून आहेत. काही मोजके उद्योग सुरु असून अनुदान मिळेल याआशेवर सुरु आहे पण बाकी भूखंड रिकामे असल्याने रात्री जंगली जनावरे व दिवसा गुरेढोरे चरण्याचे ठिकाण बनले आहे.
यामुळे नावापुरती औद्योगिक विकास कागदावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. या परिसरात रात्री अवैध धंदे चालतात असेही बोलले जात आहे. म्हणून नागभीड येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ हे नावापुरते असल्याचे दिसत आहे.