वैश्विक करणाच्या खुल्या बाजारवादाने भारताची वाटचाल गुलामी कडे – के. एन. गोविदाचार्यंजी
राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे तीन दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाच्या वतीने तीन दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन गांधी भवन, श्यामला हिल्स भोपाळ येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी बोलतांना राष्ट्रीय चिंतक तथा आंदोलनाचे संस्थापक के.एन.गोविदाचार्यंजी म्हणाले कि विकासाचे गांजर दाखवित आपले शासनकर्ता तथा प्रशासन यांचे दुरदृष्टीगत अभावाने आमची संस्कृति, सभ्यता, स्वदेशीनितीचा लोप पावली असून वैश्वीकरणाचे अनुकरण करीत बाजारवाद आमच्या जीवनशैलीवर घट्ट पकड करीत परत मानसिक गुलामगिरी आपली पाळेमुळे मजबुतीने उभी ठाकली जात असून आपली “वसुदेव:कुटूंबम्” पध्दती लोप पावत असून नवीन देशाचे स्वप्न आमच्या जीवनातील गरजा वाढवित आपल्यातील भारतीयत्व संस्कृती, समाज रचना, नातेसंबंध मोडीत निघण्याचा धोका हा चिंताजनक असून वैश्विककरणाचे बाजारवादाने आमचे उद्योगधंदे, बेरोजगारी यामध्ये वाढ झाली आहे.
यामुळे ५० वर्षाच्या कालखंडात आंम्ही ऐवढे बदललो की, एकीकडे युद्ध तर दुसरीकडे आमची सभ्यता, संस्कृती, आचारविचार, ह्यावर परिणाम झाला असून प्रकृतिमय विकासाचे ऐवजी विनाशकारी विकास हा देश पोखरुन निघण्याचा घातकी यंत्रणा ठरत आहे. त्यामुळे सत्ताधारी असलेले ही बाजारवादी लोकांचे बाहुले बनून निर्णय घेत असेल तर ती लोकशाही नव्हे असे मत के.एन.गोविदाचार्यंजी यांनी व्यक्त केले.
तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून के.एन. गोविदाचार्यंजी तर प्रमुख अतिथि म्हणून माजी राज्यसभा सदस्य महेशचन्द्र शर्मा, राजस्थान अ.भा.किसान आंदोलनाचे नेते शिवकुमार उर्फ कक्काजी शर्मा,स्वा.आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बसवराजजी पाटील, कार्यकारी संयोजक सुरेंद्र बिष्ट, माजी विधायक नवरतनजी राजोरिया, अँड. गिरीराज गुप्ता, आदी मान्यवरांचे उपस्थित होते.
प्रशिक्षण वर्गात कार्यकर्ता निर्माण व गुण हा विषय तिसरी सरकार चे प्रणेते चंद्रशेखर प्राण, संविधान व सुचिता- आंतरराष्ट्रीय पत्रकार अवधेशकुमार, भारत परस्त गरीब परस्त-बसवराजजी पाटील, संगठन कौशल्य – राष्ट्रीय संगठन मंत्री गदाधरजी विद्रोही, आंदोलन समस्या और समाधान- राष्ट्रीय सचिव प्रदीपकुमार नागपुरकर, स्वदेशीनिती व रोजगार:-बालकृष्णन नायडू , स्त्री शक्तिशाली आंदोलन भूमिका:- सुकर्मादेवी चौधरी, दिल्ली, प्रकृति विकास व पर्यावरण:- आर.के.पालीवाल, महात्मा गांधी तथा जयप्रकाश नारायण कि भारतीय व्यवस्था कल्पना:- आमदार सरयुप्रसाद राँय, झाँरखंड, सहजीवन व जैविक शेतीचा विकास:- अल्कादीदी जैन, आदी सत्राद्वारे हे प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यात आले.
समारोपिय सत्राचे अध्यक्षस्थानी गांधी भवन, भोपाळचे सचिव दयारामजी नामदेव, तर प्रमुख अतिथि म्हणून गांधी न्यासचे कोषाध्यक्ष अरुणकुमार डनायक, के.एन.गोविदाचार्यंजी, राष्ट्रीय सहसंयोजक नवरतनजी राजोरिया, राष्ट्रीय सचिव प्रदीपकुमार नागपुरकर, आदींचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
राष्ट्रीय प्रशिक्षण वर्गात निवडक १२ राज्यातील ५० प्रतिनिधीमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश, झाँरखंड, बिहार, तामिलनाडु, कर्नाटक, दिल्ली एन.सी.आर. च्या प्रतिनीधींनी सहभाग घेतला.
आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बसवराजजी पाटील यांनी म्हटलं कि प्रशिक्षणाने कार्यकर्त्यांनमध्ये संघटनात्मक अनुशासन गुण निर्माण होण्याचा मानस निर्माण होऊन आपल्या देशसेवेसाठी भावना जागृत होवून व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी मदत मिळत असते. मनुष्याने स्वत: विकास कसा साध्य करावा हा मंत्रसुध्दा द्विगुणित होऊन राष्ट्र परम् वैभवशाली बनावा तो शाश्वत ५०० वर्षापासून चालत आलेला इतिहास मनुष्याने लक्षात घेतला पाहिजे असे मत मांडले.
मनुष्याने शुभ लाभ हा भाव सोडून लोभ लाभ हा भाव वाढीस लागल्याने राष्ट्रवाद हा मोडकळीस येऊ नये यासाठी राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचा हा शंखनाद गर्जना करीत व्यवस्था परिवर्तन यासाठीचं राजकिय पक्षावर नियंत्रण दबाव गट निर्माण करणे यासाठी जन आंदोलनाच्या भुमिका महत्वपूर्ण ठरत असतात असे विचार शिवप्रसाद उर्फ कक्काजी शर्मा यांनी मांडले, तर अंतोदय विकास हाच मानव उत्थानवाद सिध्दांत ठरतो असे विचार महेशचंद्र शर्मा यांनी व्यक्त केले.
हा प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी महेश दुबे, भाष्कर रमन, मंजूनाथ, स्वाती लोधी, मंजुषा सागर, शरद शहारे, पवनकुमार दुबे, एकता फाँउन्डेशन, प्रदीप दलाई,कु.प्रग्या छारी, शिवप्रसाद तेली, चौरसिया, आदीने परीश्रम घेतले.