Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत राष्ट्र समिती पार्टी द्वारा शासकीय विश्रामगृह वर्धा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन

माजी आमदार श्री.चरणदादा वाघमारे यांनी केले मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी वर्धा येथील शासकीय विश्रामगृह येथे भारत राष्ट्र समिती पार्टी व्दारे सभा घेण्यात आली असून या सभेला उपस्थित असलेले मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले माजी आमदार श्री.चरण दादा वाघमारे,पूर्व विदर्भ समन्वयक, माजी आमदार वसंतराव बोंडे वर्धा जिल्हा समन्वयक अजय उर्फ पवन तिजारे साहसिक दैनिक वृत्तपत्राचे व चॅनलचे संपादक रविन्द्र भाऊ कोटंबकार आर्वी विधानसभा समन्वयक जयदादा बेलखेडे यांच्या कडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

पत्रकारांशी संवाद साधला असता माजी आमदार श्री चरणदादा वाघमारे यांनी सांगितले की तेलंगणा सरकार ने शेतकरी बांधवांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना आणि नागरिकांन बद्दल जशी योजना राबविण्यात आल्या आहेत तशीच योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुध्दा राबविले पाहिजेत आणि यानंतर रविन्द्र भाऊ कोटंबकार यांनी सुध्दा असे मत मांडले आहेत.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारत राष्ट्र समिती पार्टीचे कार्याध्यक्ष आणि कार्यकर्ते अजय घंगारे रमेश दिवटे आसिफ शेख नंदू मून आणि नव्याने प्रवेश केलेले 35 सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये