ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

बापुरावजी देशमुख यांच्या स्वप्नातील आदर्श शाळा बनविणे हिच खरी श्रद्धांजली – कॅप्टन मोहन गुजरकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वायगांव : ‘आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न उराशी बाळगून कार्य केले. ग्रामीण भागातील मुलांमुलीकरीता शिक्षण क्षेत्र विस्तारले. आपल्या शाळा आदर्श व्हाव्यात म्हणून खडतर प्रयत्न केलेत. आज आपण बापुरावजी देशमुख यांच्या स्वप्नातील आदर्श शाळा बनविणे हेच ध्येय समोर ठेवून कार्य केल्यास हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन स्थानिक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन मोहन गुजरकर यांनी शिक्षण महर्षी स्व बापुरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात 26 जुलै रोजी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बापुरावजी देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन मोहन गुजरकर तर प्रमुख वक्ते म्हणून अध्यापक जनार्दन मते व अध्यापिका भारती कार्लेकर उपस्थित होते.

या प्रसंगी अध्यापिका अर्चना धानोरकर यांनी स्वरचित कवितेतून स्व. दाआजी यांना अभिवादन केले. अध्यापिका वैशाली फरताडे, भारती कार्लेकर व वैशाली राऊत यांनी भजन सादर केले.

संचालन प्रा. वनिता देशमुख तर आभार अध्यापिका कांचन काळे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये