ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

विमानातील इतर पाच जणांचाही मृत्यू - बारामतीजवळ लँडिंग दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार ह्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक वृत्त हाती आले असून त्यांच्यासह विमानातील सहा जणांचाही अपघाती मृत्यु झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार अजित पवार आज सकाळी ८:०० वाजता मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना (Landing) वैमानिकाचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीवर आदळून बाजूच्या शेतात घुसले आणि काही क्षणातच विमानाने पेट घेतला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमान कोसळल्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट दिसत होते.

          अपघाताची बातमी समजताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि पीए (Personal Assistant) यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने बारामती येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचे प्राण वाचु शकले नाही.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांशी तसेच प्रशासनाशी संपर्कात आहेत. संपर्क दरम्यान, नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून अपघाताची पुष्टी करण्यात आली असुन त्यांनी देखिल उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांचा मृत्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे इंजिन निकामी झाले की अन्य काही मानवी चूक होती, याचा तपास लवकरच सुरू होईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये