ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नंदोरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ

तालुक्यातील 70 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन लाईव्ह प्रक्षेपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनात पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ नंदोरी येथे घेऊन भद्रावती तालुक्यातील 70 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन राज्यस्तरिय लाईव्हप्रक्षेपण घेण्यात आले.

कार्यशाळेच्या उद्घाटक व अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, प्रमुख अतिथी सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार, सरपंच मंगेश भोयर, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिवतोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आसुटकर, उपसरपंच उषा लांबट, किशोर उमरे, शरद खामनकर, भानुदास ढवस, जयश्री एकरे, विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, प्रणाली भागवत, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र लोंढे होते. प्रथम मुख्य मार्गावर साफसफाई करुन स्वच्छतेची शपथ घेण्यातआली. राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या स्वागतासाठी स्वागत गीत गाण्यात आले.

गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागात ग्रामपंचायतची कार्यक्षमता वाढविणे, सुशासन प्रशासन, मनरेगा योजना अभिसरण, ग्राम पातळीवरील संख्या सक्षमीकरण, उपजिवीका विकास यावर मार्गदर्शन केले. तसेच सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार यांनी सामाजिक न्याय, सहभाग व श्रमदानातून लोकसहभाग यावर मार्गदर्शन केले. नरेंद्र जिवतोडे यांनी स्वच्छता ही सेवा मोहीम याविषयी, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र लोंढे यांनी पांदण रस्त्याविषयी मुद्देसूद मार्गदर्शन केले. यावेळी आदिशक्ती समीती स्थापन करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच मंगेश भोयर, संचालन शिक्षक अमीत गजभिये यांनी केले. तर ग्रामपंचायत अधिकारी विकास तेलमासरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, एपीओ सुरज खोडे, राहुल घायवनकर, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये