भद्रावती शहरातील विद्युत व्यवस्था कोलमडली

चांदा ब्लास्ट :अतुल कोल्हे भद्रावती
भद्रावती शहरात सध्या वीज व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून अकार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे शहरातील विद्युत व्यवस्था पूर्णता कोलमडलेली आहे. गेल्या एक महिन्यापासून भद्रावती शहरात विजेचा लपंडाव सुरू असून या एक महिन्याच्या काळात शहरातील विद्युत पुरवठा दररोज वेळोवेळी खंडित होत असल्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे, मात्र यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याऐवजी येथील अधिकारी स्वस्थ बसून असल्यामुळे नागरिकांना निरंतर त्रास भोगाव लागत आहे. दररोज शहरातील विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर तो दोन ते तीन तास पूर्ववत होत नाही वीज वितरण कंपनीच्या चौकशी विभागाला नागरिकांनी फोन केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही व संपर्क झाल्यास थातूरमातूर उत्तरे देऊन नागरिकांची बोळवण केल्या जात आहे. शहरातील दररोज रात्रच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित होत असतो तो रात्री उशिरापर्यंत सुरू केल्या जात नाही. नागरिक दिवसभर थकून रात्रच्या वेळी घरी जाऊन आरामाची अपेक्षा करीत असतो मात्र झोपायच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागते. वादळ -वारे व पाऊस नसताना सुद्धा शहरातील विद्युत पुरवठा नेहमी खंडित होत असतो व तो उशिरापर्यंत बंदच असते या अनियमित विज पुरवठ्यामुळे शहरातील नागरिक फार मोठे त्रस्त झाले असून अनेकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब लक्षात आणून दिली मात्र या समस्येवर येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी अकार्यक्षम ठरले आहे. येथील मुख्य अधिकाऱ्यांना या समस्येबाबतची अद्यापही कल्पना नाही यावरून हे अधिकारी आपल्या कारभाराविषयी किती गंभीर आहे हे दिसून येते. गेल्या एक महिन्यापासून निरंतरपणे सुरू असलेल्या या समस्येबाबत जाब विचारण्यासाठी नागरीक गेले असता त्यांच्याशी अधिकारी सभ्यपणे वागत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावरून सदर अधिकाऱ्यांचे येथील कारभारावर नियंत्रण नसल्याचे लक्षात येते ही समस्या शहरातच नव्हे तर तालुक्याचे अन्यत्रही दिसून येत आहे .नुकतेच तालुक्यातील घोडपेठ येथील नागरिकांनी खंडित वीज पुरवठ्याबाबत निवेदन देण्यात आले, याशिवाय शिवसेना भद्रावती- वरोरा तालुका समन्वयक तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांनी याबाबत निवेदन देऊन चक्क आंदोलनाचा इशारा दिला आहे .यावरून शहरातील व तालुक्यातील वीज समस्याची गंभीरता लक्षात येते येत्या काही दिवसात ही समस्या सोडविली गेली नसल्यास नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनी विरोधात मोठा स्फोट होऊन एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही त्यामुळे विज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा .यासंदर्भात वीज वितरण कंपनीने शहरातील नागरिकांच्या सहनशील तिचा अंत पाहू नये असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे