ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावातील वळन रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

चेकबरांज (मानोरा), बरांज मोकासा, तांडा या गावातील नागरिक त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       शहरातून चंदनखेडा मार्गे जाणाऱ्या वळन रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसापासून शहरातील घाणकचरा इथे टाकल्या जात असल्याने या भागात घाणीचे साम्राज्य तयार होऊन या परिसरात दृगंधी पसरली आहे या समस्येबाबत भद्रावती नगरपालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चेक बरांज येथील उपसरपंच तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू डोंगे यांनी केला आहे.

रस्त्यालगत चेक बरांज (मानोरा), बरांज मोकासा , तांडा ही गावे लगतच आहे या गावातील नागरिकांना तसेच बरांज कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांना येथुनच जावे लागते या वळन रस्त्यावर शहरातील हॉटेल व्यावसाईक, कॅटरींग व्यावसाईक टाकाऊ खाद्यपदार्थ यावर रस्त्यावर आणून टाकत असतात तसेच मास विक्रेते, पशु तसेच मृत झालेले पाळीव प्राणी या रस्त्यावर टाकत असतात.

यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाल्याने दुर्गंधी पसरत आहे . तसेच या सोबत प्लास्टिक पिशव्या टाकत असल्याने त्या वाऱ्यामुळे गावात जमा होत असतात यामुळे या चारही गावातील नागरिकांना गेल्या कित्येक दिवसापासून त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराबाबत नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देउन घाणीबाबत सूचित केले आहे. नगरपालिका क्षेत्रात घन कचरा प्रकल्प असून या वळन रस्त्यावर शहरातील काही व्यावसायिक परिसरात घाण कचरा टाकत आहे.

नगरपरिषद प्रशासनाने त्या वळन रस्त्यावर सूचनाफलक लावून शहरातील कचरा टाकण्यासाठी प्रतिबंध लावावा तसेच अश्या घान कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी चेकबराज येथील उपसरपंच तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू डोंगे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये