ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रस्तावित ग्रेटा एनर्जीच्या जनसुनावणीत रोजगारासाठी गावकरी आक्रमक

प्रकल्पाचे स्वागत ; मात्र स्थानिकांना रोजगार देण्याची नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील तेलवासा येथे बुधवारी ग्रेटा एनर्जी लिमिटेडच्या प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात पर्यावरण विषयक जन सुनावणी पार पडली. या सुनावणीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून बहुसंख्य लोकांनी प्रकल्पाचे स्वागत केले. सुनावणी दरम्यान स्थानिकांनी प्रकल्पामुळे तालुक्याचा औद्योगिक व आर्थिक विकास होईल अशी आशा व्यक्त केली. मात्र प्रकल्पासाठी स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार द्यावा अशी ठाम मागणी नागरिकांनी प्रशासन आणि कंपनीकडे केली.

ग्रेटा एनर्जी लिमिटेड कडून प्रकल्पाची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये पर्यावरणीय उपायोजना, पाणी व वायू प्रदूषण नियंत्रण, वृक्षलागवड, तसेच स्थानिक समुदायासाठी सामाजिक उपक्रमांचे आश्वासन देण्यात आले. सुनावणी दरम्यान अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, प्रदुषण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर बहादुले, प्रादेशिक अधिकारी संजय पाटिल, उपविभागीय पोलिस अधिकारी नायोमी साटम, तहसिलदार भद्रावती, ग्रेटा एनर्जी तर्फे उपाध्यक्ष वैभव काकुलते, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष महापात्रो, प्रकल्प व्यवस्थापक विरेंद्र शेळके तसेच व्यवस्थापकीय संचालक अनुप गोयल उपस्थित होते.

यावेळी परिसरातील तेलवासा, ढोरवासा, पिपरी(देशमुख), कोची, घोनाड, मुरसा, चिरादेवी, भद्रावती, चंद्रपूर तसेच ईतरही गावातील सरपंच, उपसरपंच व गावकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित बहुतेकांनी प्रकल्पाचे स्वागतच केले.

मात्र, प्रदूषण नियंत्रित ठेवावे, गावकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात यावीत, तसेच स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यात याव्या अशा मागण्या करण्यात आल्या. नागरिकांच्या मागण्या मान्य करण्याचे व्यवस्थापनातर्फे आश्वासन देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये