वनविभागाने समुपदेशन घेउन पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना पदस्थापना द्यावी
वनरक्षक वनपाल संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे
शासन निर्णय दि. 22 मे 2017 शासन निर्णय दि.9 एप्रिल 2018 वरील शासन नुसार कर्मचारी यांची बदली वनविभागाच्या प्रत्येक शाखेत करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसारच कर्मचारी ची बदली प्रक्रिया राबविण्यात यावी. सदर बदली प्रक्रिया राबवत असताना प्रत्यक्ष समुपदेशन घेऊन पात्र कर्मचाऱ्यांना पदस्थापना द्यावी जेणेकरून बदली प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार होणार नाही किंवा बदली प्रक्रियेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व सर्वांना न्याय मिळेल.
बदली हंगाम २०२५ मध्ये कोणतीही अनियमितता आढळून आल्यास किंवा कोणताही गैरप्रकार घडल्यास वनरक्षक वनपाल संघटना संपूर्ण बदली प्रक्रियेविरूध्द आंदोलनात्मक पावित्रा घेईल व होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आपले वनप्रशासन जबाबदार राहील, असे वनरक्षक वनपाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे यांनी उपवनसंरक्षक बुलढाणा यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्य वन संरक्षक, अमरावती, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, बुलढाणा यांना पाठविलेल्या आहे.