ताज्या घडामोडी

सरपंच रामदास चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून मारहाण करणाऱ्या राकेश वाघ याला तात्काळ अटक करा

अन्यथा आंदोलन करू : सौ.प्रिति दिडमुठे

चांदा ब्लास्ट :चिमूर प्रतिनिधी

चिमुर पंचायत समिती अंतर्गत मौजा बोरगाव (बुट्टी) येथील सरपंच रामदास चौधरी यांच्यावर गावातील राकेश वाघ या व्यक्तीने शासकीय विहीर बांधकामात अडथळा निर्माण करून दिनांक २३ जून २०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजताच्या दरम्यान दारू पिऊन तीन वेळा तीन ठिकाणी प्राणघातक हमला करून बेदम मारहाण केली.ग्रामस्थांच्या मध्यस्थी मुळे प्राणघातक हल्ल्यामधून सरपंच रामदास चौधरी वाचले असले तरी त्यांना मुका मार आणि जखमा मोठया प्रमाणात झालेल्या आहेत.

राकेश वाघ हा दारुडा असून तो ट्रक ड्रायव्हर आहे.राकेश वाघ हा सरपंच रामदास चौधरी यांना जिवंत ठार मारण्याची धमकी देत फिरत आहे.दारुड्या व्यक्तीला ट्रक चे लायसन्स साठी लागणारे मेडिकल सर्टिफिकेट ज्या डॉक्टरांनी दिले त्या डॉक्टरांचेची मेडिकल लायसन्स रद्द करण्यात यावे अशी जनमानसात मागणी होत असून राकेश वाघ याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची मागणी  जनतेकडून करण्यात येत आहे.

सरपंच रामदास चौधरी बोरगांव (बुट्टी) तहसील चिमुर जिल्हा चंद्रपूर यांनी केलेल्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन भिसी यांनी राकेश वाघ याच्यावर गुन्हे दाखल केले असले तरी सरपंच रामदास चौधरी यांना मारहाण करणारा राकेश वाघ याने अटक होण्याच्या भीतीने गावातील चौकातच घरी जाऊन ब्लेड आणून स्वतःच स्वतःवर अंगावर चिरे मारून घेत सरपंच रामदास चौधरी यांना आई बहिणीवरून अत्यंत अश्लील चाळे हावभाव करत शिवीगाळ करून राकेश वाघ याने सुद्धा खोटी पोलीस तक्रार पोलीस स्टेशन भिसी मध्ये दिली.

पोलिसांनी कसलीही शहानिशा न करता सरपंच रामदास चौधरी आणि राकेश वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला.

मेडिकल ऑफिसरने राकेश वाघ अल्कोहोलिक आहे हे नमूद करावयास हवे होते तसेच मोक्का चौकशी करून गुन्हे दाखल करायला हवे होते मात्र भिसी पोलिसांनी असे काहीही न करता राकेश वाघ याला परत गुन्हा करण्यास प्रोत्साहन देत सोडून दिले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे जनतेचे म्हणणे आहे.यास सर्वस्वी भिसी पोलिस स्टेशन जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

राकेश वाघ दारू पिऊन होता.त्याला दारूच्या नशेत काय करीत आहे हे कळत नव्हते.तरी देखील मौका चौकशी न करता सरपंचावर गुन्हा दाखल करण्याचे रहस्य आकलनाच्या पलीकडचे आहे.

सदर सरपंच रामदास चौधरी मारहाण प्रकरणाची पारदर्शक मौका चौकशी करून सरपंच यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन आरोपीला तात्काळ अटक करून सरपंचांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री-गृहमंत्री यांना तहसीलदार चिमुर यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात केले असून मागणी पूर्ण न झाल्यास विविध संविधानिक आयुधांचा वापर करून आंदोलने केली जातील असे सौ.प्रिति दीडमुठे कळवितात.

निवेदन सादर करतांना चिमुर तालुक्यातील सरपंच उपसरपंच मोठया संख्येने उपस्थित होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये