ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पुराच्या पाण्याने जमिन खरडून पिकेही वाहून गेली!

निसर्गाने केला शेतकऱ्यांच्या आयुष्याचा तमाशा ; चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- गेल्या आठवडा भरापासून कमी अधिक प्रमाणात सुरू असलेला पाऊस आणि काल बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाच थयथयाट बळीराजाला उध्वस्त करून गेला.नाल्यालगत व उतार भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसून जमीन खरडून पिके वाहून गेली.डोलदार दिसणाऱ्या पिकाच्या भरोश्यावर आयुष्यच स्वप्नं गिरवणाय्रा शेतकऱ्यांच्या काळजावर निसर्गाने नुकसान करून काळजावर डागण्याच प्रकार झाला आहे.वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना निसर्गाकडून आयुष्यच तमाशा होत असल्याने शेतकऱ्यांना महागाईच्या काळात जगणेही मुश्किल होत आहे.पुराच्या पाण्यात शेतातील पिकांचे झाले नुकसान,कोलमडलेले अर्थकारण,कर्जाची चिंता,संसाराचे बिघडलेले गणित,मुलाबाळांच्या भविष्याची काळजी यामुळे  पहाडावरील शेतकरी जगण्याच अवसानच गमवून बसला आहे.
जिवती तालुक्यात प्रामुख्याने मुख्य पिक व कमी दिवसात येणाऱ्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्यात कापूस,तूर,सोयाबीन,ज्वारी,मुग,उडिद यात सर्वाधिक कापूस पिकांची लागवड पाहायला मिळते.निसर्गाच्या भरोश्यावर शेती करून आपल्या संसाराची गणिते जुळवलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाकडून वर्षानुवर्षे दगा होतो.त्यामुळे शेतकरी बांधवात प्रगती होण्याऐवजी खचला जातो.यंदाही तिच परिस्थिती निर्माण झाली बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या पुरामुळे तालुक्यातील सेवादासनगर,हटकरगुडा,मांगगुडा,नोकेवाडा,महाराजगुडा, गुडशेला वंजारीगुडा, प्रेमनगर,धानोली तांडा, देवलागुडा,लोलडोह,जिवती,येरमीयेसापूर,करणकोंडी,घारपना,कोदेपूर,केकेझरी,कुंभेझरी,टेकाअर्जुनी,नागापूर,धोंडाअर्जुनी,चिखली(पाटण),दमरमोहदा,भारी,सह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासह शेतीचेही नुकसान झाल्याचे चिञ आहे.संबंधित विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे पंचनामे करून मद द्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

अनेकाच्या घरात अन् शेतात पाणीच पाणी !
——————————————-
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील प्रेमनगर गावात अनेकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले तर तालुक्यालगत असलेल्या धांनोली तांड्यात पुराचे पाणी गावात घुसल्याने अनेकांच्या घरात आणि गावात पाणीच पाणी झाल्याने येथील नागरिकांना भितीमय वातावरणात संपूर्ण राञ पाण्यातच काढावी लागल्याचे गावकरी सांगत आहे.या आधी सुध्दा अनेकवेळा या गावात पुराचे पाणी घुसले होते.याबाबत फक्त अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते माञ पुराचे पाणी गावात घुसू नये यासाठी कुठलीच उपाय योजना केली जात नसल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अतिक्रमनधारक शेतकऱ्यांच शासन विचार करेल काय?

तालुक्यातील बहुतांश शेतकरी ताब्यात असलेल्या अतिक्रमण शेतीवर शेती करतात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वर्षानुवर्षे त्यांना सहन करावा लागतो माञ केवळ जमिनीचा मालकी हक्क नसल्याने त्या शेतकऱ्यांना शासनाची कुठलीच मदत मिळत नाही.अशा शेतकऱ्यांचे सुध्दा शासनाने दखल घेऊन त्यांना सुध्दा नुकसान भरपाईचा अनुदान मिळावा अशी मागणणी मुकादमगुडा येथील शेतकरी रामदास रणवीर,करणकोंडी येथील शेतकरी राम चव्हाण यांनी केली आहे.

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पुर येऊन शेतातील पिकासह जमिन खरडून वाहून गेली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.तात्काळ या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून मदत जाहिर करावी

– उदल राठोड, शेतकरी सेवादास नगर

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये