शास्त्री नगर येथील वीज समस्या विरोधात नागरिकांचा वेकोली कार्यालयावर घेराव

चांदा ब्लास्ट
घुग्घूस : शहरातील वेकोलीच्या पुनर्वसन अंतर्गत वसविण्यात आलेल्या शास्त्री नगर आंबेडकर नगर येथील लोकवस्ती व वेकोलीच्या वसाहती मध्ये राहणाऱ्या नागरिकांची भरउन्हाळ्यात व रमजान मास शुरु असतांना बारा तास वीज कपात करण्यात आल्याने नागरिकांत प्रचंड आक्रोश निर्माण झाला सदर घटनेची माहिती कळताच काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांच्यातर्फे आज दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता दीडशे ते दोनशे नागरिकांना घेऊन वेकोली कार्यालयाचा घेराव घालण्यात आला
याप्रसंगी वेकोलीचे सब एरिया अधिकारी सुधाकर रेड्डी यांनी आंदोलन कर्त्या काँग्रेस नेते व नागरिकांशी बैठक केली
याबैठकीत वेकोलीच्या कवार्टर मध्ये राहणाऱ्या नागरिकांना महावितरण कार्यालया कडून वीज पुरवठा घेण्यासाठी परवानगी देण्यात येईल
दफाई नागरिकांना सध्या 20 मार्च पर्यंत केवळ पाच तास वीज कपात केल्या जाईल यानंतर याप्रकरणात वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन वीज व पाणी संदर्भातील तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी काँग्रेस जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,नुरुल सिद्दीकी, अरविंद चहांदे, विजय माटला,दिपक पेंदोर, सुकुमार गुंडेटी,कुमार रुद्रारप, शहशाह शेख,विक्की मादर, लोकवस्तीचे सामाजिक कार्यकर्ते महेश बल्ला, विक्की सारसर,अविनाश गोगुर्ले, सूरज लभाने, छोटू कलवल, राहुल झाडे,, किशन कणकम, जोसेफ चिलका, समर्थ गोटलावार, अशपाक शेख, संजू कुक्का, मुन्ना मिश्रा,फिरोज शेख,तिरुपती कणकम, अमर कापटे, मेघराज बंसारी, गुरूदास कणकम, दर्शन तालापेल्ली, विलास कोत्तूर, छाया भगत, वैशाली दुर्योधन, पुष्पा कणकम व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते