ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारवैभवातून युवापिढीने स्फुर्ती घ्यावी – हंसराज अहीर

स्वा. सावरकरांच्या स्मृतिस अभिवादन..!

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : प्रखर देशभक्ती, प्रचंड साहस, अफाट दूरदृष्टी व सर्वच क्षेत्राशी निगडीत सखोल ज्ञान हे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या जीवनाची शक्तीस्थाने होती त्यांचे राष्ट्रसमर्पित महान कार्य, त्याग, साहित्यकृती, वाणी व आचरणातून वर्तमान व भावी पिढ्‌यांसाठी दिलेल्या विचारांचा वारसा जपणे व त्यानुरूप राष्ट्राच्या, समाजाच्या उन्नतीकरिता योगदान देणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे मत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमास संबोधित करतांना व्यक्त केले.

चंद्रपूर महानगरातील पोलिस मुख्यालयासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती स्मारक स्थळी दि. २६ फेब्रुवारी रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, रत्नाकर जैन, गिरीष अणे, विनोद शेरकी, राजु घरोटे, विकास खटी, रवि गुरनुले, सुभाष कासनगो‌द्धवार, प्रमोद शास्त्रकार, देवांनद वाढई, अजय जयस्वाल, राजु वेलंकीवार यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

हंसराज अहीर पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी युवकांना सेनेत सामील होण्याकरिता सदैव प्रोत्साहित केले. प्रत्येक युवक, युवती देशाच्या कामी आला पाहिजे असे या महान सुपुत्राचे विचार होते. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगतांना स्वातंत्र्यवीरांनी ‘कमला’ सारखे महाकाव्य कारागृहाच्या भिंतीवर लिहून मुखोद्गत केले. ने मजशी ने.. हे काव्य समुद्रात उडी घेतल्यानंतर त्यांनी स्मरले होते. अशा महान क्रांतीकारकांच्या स्मृतीदिनातून प्रत्येकांनी स्फुर्ती घेत त्यांच्या विचारवैभवाचा वारसा जपला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शक्तीशाली राष्ट्राचे जे स्वप्न बघितले होते, त्या स्वप्नपुर्तीकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अग्निवीर संकल्पना राबविली व सीमा सुरक्षा, सेना सक्षमीकरण या सावरकरांच्या भुमिकेला पुरक असे कार्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारू – किशोर जोरगेवार

याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवनकहाणी, संघर्ष आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात असे सांगितले. ब्रिटीश सत्तेच्या विरोधात उभे राहून त्यांनी प्रखर राष्ट्रभक्तीचे उदाहरण घालून दिले. त्यांनी आपल्या क्रांतिकारक विचारांनी संपूर्ण देशाला स्फुर्ती दिली त्यांच्या लेखणीने तरूणांना स्वातंत्र्यासाठी झुंज द्यायला शिकविले, त्यांच्या कृतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यायची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन म्हणजे धैर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा अखंड प्रवाह असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. युवकांनी त्याचे राष्ट्राभिमुख विचार अंगीकारल्यास तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे सांगत पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या या महानगरात सावरकरांचे अतिसुंदर स्मारक निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

याप्रसंगी अंजली घोटेकर, अशोक जिवतोडे व रत्नाकर जैन यांनीही औचित्यपूर्ण विचार व्यक्त केले. उपस्थितांनी स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्रास माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतिस अभिवादन केले. कार्यक्रमास शिला चव्हाण, माया उईके, वंदना संतोषवार, सारीका संदुरकर, अरूण तिखे, दिनकर सोमलकर, रवी लोणकर, सचिन कोतपल्लीवार, शाम कनकम, रमेश भुते, राजु येले, श्रीकांत भोयर, संजय खनके, संदीप देशपांडे, संजय मिसलवार, डॉ. गिरीधर येडे, प्रा. रवी जोगी. पुनम तिवारी, गौतम यादव. पुरूषोत्तम सहारे, सुदामा यादव, प्रलय सरकार, पराग मलोडे, प्रविण गिलबिले. सुरेश जुमडे, हेमंत डहाके, धनराज कोवे, तुषार मोहूर्ले, गोपाळ आक्केवार, संतोष भोस्कर, अशोक सोनी, गंगाधर कुंटावार, सुरेश यादव, अनिश दिक्षीत, सुनि सुनिलसिंग ठाकुर, शालु कन्नोजवार, वि.पी. सिंग, वसंत धंदरे यांचेसह अनेकाची उपस्थिती होती. या कार्यकमाचे संचालन व प्रास्ताविक विकास खटी यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये