देऊळगाव राजा येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा पारायण सोहळा सुरू
27 फेब्रुवारी रोजी होणार समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री संत नरहरीनाथ महाराज मठ देऊळगाव राजा येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठागमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव ३७५वर्षपुर्ती निमित्ताने श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा पारायण सोहळा व भव्य नामसंकीर्तन महोत्सव 20 फेब्रुवारी पासून सुरू झाला आहे.27 फेब्रुवारी रोजी महोत्सव ची सांगता होईल.
प पू गुरुवर्य मोहंननाथ महाराज पैठणकर व ह भ प वेदविभूषण श्री उदबोधमहाराज पैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कार्यक्रमांत पहाटे पाच वाजता काकड आरती, सात वाजता विष्णू सहस्त्रनाम, साडे सात वाजता गाथा पारायण, दुपारी बारा वाजता महा आरती व महाप्रसाद, दुपारी साडे चार वाजता प्रवचन, सायंकाळीं साडे पाच वाजता हरिपाठ, रात्री सात वाजता किर्तन, व नऊ वाजता भोजन प्रसाद कार्यक्रम दररोज होत आहे .या महोत्सवात ह भ प श्री महेश महाराज खाटेकर, आळंदी, गणेश महाराज वाघ, आळंदी, विजय महाराज खवले, मुक्ताई नगर, सदाशिव महाराज पुरंदरे, ग्वाल्हेर, रमेश महाराज जायभाय, वैष्णव गड, यांचे प्रवचन, तसेच ह भ प संजय नाना महाराज धोंडगे, नाशिक, संजय महाराज पाचपोर, अकोला, रविदास महाराज शिरसाठ, आळंदी, प्रमोद महाराज जगताप, बारामती, एकनाथ महाराज नामदास, पंढरपूर, अनिरुद्ध महाराज क्षिरसागर, मुक्तधाम, उद्बोधमोहननाथ महाराज पैठणकर, देऊळगाव राजा यांचे कीर्तन होत आहे.27 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता ह भ प उल्हास महाराज सूर्यवंशी, आळंदी यांचे काल्याचे कीर्तन ने सांगता होईल,
या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन श्री संत नरहरीनाथमहाराज संस्थान देऊळगाव राजा यांनी केले आहे.