संत निरंकारी मिशन द्वारा स्वच्छ जल स्वच्छ मन मिशन
23 फेब्रुवारीला भद्रावती येथे प्रोजेक्ट मिशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
संत निरंकारी मिशन दर वर्षी प्रमाणे या वर्षीही रविवार दिनांक 23 फेब्रुवारी ला संपूर्ण भारतभर “स्वच्छ जल स्वच्छ मन” अभियान राबविनार आहे. या अभियान अंतर्गत देशभरातील दोन लाखाचे वर निरंकारी स्वयंसेवक देशभरातील संपूर्ण जलस्रोत उदा. समुद्र तट, नदींचे कीनारे, झरने, तलाव, पान्याच्या टाकी, विहीरी, नाल्या ई.ना स्वच्छ व निर्मल करुन स्वच्छतेप्रती जागृति संदेश देनार आहे. या अंतर्गत स्वयंसेवकांतर्फे नैसर्गिक जलस्रोत क्षेत्रातिल प्लास्टिकचा कचरा, मलमूत्र कचरा, झाडी, वेल, अन्न ई. चा कचरा साफ केल्या जाणार आहे. राजधानी दिल्लीत तर ‘ आओ सॅंवारे यमुना किनारे ‘ या नाऱ्याने जागृति केल्या जात असते.
भद्रावती येथेही संत निरंकारी मिशन भद्रावती शाखेच्या स्वयंसेवकांतर्फे रविवार दिनांक 23 फेब्रुवारी ला गणेश मंदिर गवराळा येथिल तलावाचा संपूर्ण परीसर, रस्ते, झाडे स्वच्छ व सुशोभित करन्यात येनार आहे. स्वच्छता अभियान सकाळी 7.30 ते सकाळी 10.00 वाजे पर्यंत व सत्संग कार्यक्रम दुपारी 3.00 ते 5.00 पर्यंत राहील. ईच्छुक व्यक्तिंना दोनही कार्यक्रमाला ऊपस्थित राहता येईल.
स्वच्छ जल स्वच्छ मन या सामाजिक उपक्रमा बरोबरच संत निरंकारी मिशन कल्याणकारी योजना राबविन्यात नेहमी अग्रेसर असते.यामधे रक्तदान, वृक्षारोपण, पर्यावरण जागरूकता कार्यक्रम राबवुन पृथ्वी तलाला स्वच्छ आणि सुंदर ठेवन्याचा संदेश देत असते, सामाजिक बांधीलकीची जोपासना करीत असते.