अनवधनाने घडलेल्या अपराधाचे नाट्य : चंद्रकमल थिएटर्सचे ‘भलतंच घडलं वेडाच्या भरात’ : प्रा. राजकुमार मुसणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
परिस्थितीने हताश झालेल्या अभावग्रस्ततेचे जिने जगणाऱ्या एका उमद्या तरुणींच्या आयुष्यात अनपेक्षितपणे घडलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे तिचे आयुष्य नाहक उदध्वस्त होते. अनपेक्षितपणे ओढवलेल्या संकटाने हतबल झालेल्या तरुणीची दुःखाने ग्रासलेली कैफियत म्हणजेच’ भलतच घडलं वेडाच्या भरात ‘ हे नाटक होय. तसेच इतरांच्या कट कारस्थानाला नाहक बळी ठरलेल्या मोहनच्या जीवनाची व्यथा म्हणजे हे नाटक आहे.
अर्थातच नराधमांच्या विकृत प्रवृत्तीचा बळी ठरलेल्या एका घरंदाज,सुशिक्षित तरुणांच्या जीवनाची दुर्दशा कशी होते आणि त्याच्या आयुष्यात वेडेपणाच्या धुंदीत भलताच अपराध कसा घडतो, याचे दर्शन या नाटकातून होते.
चंद्रकमल थिएटर्स वडसा प्रस्तुत, प्रा.डॉ.शेखर डोंगरे निर्मित, दिग्दर्शित आनंद भिमटे लिखित ‘भलतच घडलं वेडाच्या भरात ‘या तीन अंकी नाटकाचा प्रयोग श्री विघ्नहर्ता युवा गणेश मंडळ तारसा खुर्द यांच्या सौजन्याने १३ फेब्रुवारी २०२५ गुरुवारला यशस्वीरित्या संपन्न झाला.
रामेश्वर दास सेठ यांचा मुलगा मोहन व सून पल्लवी हे नवदांपत्य लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेर फिरायला येतात. जीवनातले काही क्षण आनंदात प्रेम गीताने गातात . सुखद क्षण मौजेने रिसॉर्टमध्ये घालवताना जंगल सफारीसाठी भ्रमण करायला बाहेर पडतात. दांपत्याच्या आनंदाला उधाण येत प्रेम अन् रोमान्स ओसंडून वाहत असतानाच राकेश डागा नावाच्या खलनायकाची एन्ट्री होते. स्वतःच पुढाकार घेत मित्राच्या नात्याने वैदर्भीय अमरावतीचा असल्याचे सांगत ओळख पटवत राकेश जवळीक साधतो. चामुंडा देवीचा प्रसाद मोहनला देतो तर प्रसाद खाल्ल्यामुळे मोहन बेशुद्ध पडतो परंतु पल्लवी बाजारातील प्रसाद व अनोळखी तरुणांमुळे मनात शंका निर्माण झाल्याने प्रसाद खाणे टाळते.
प्रसाद खाल्ल्यामुळे मोहनचे डोकं गरगरायला लागते. मोहन खाली कोसळतो. या प्रकाराने अचंबित पल्लवी भयभित होते. मदतीसाठी याचना करते परंतु जंगल परिसरात खूप ओरडूनही कोणीही येत नाही. पाठलाग करणाऱ्या राकेशला खायला काय दिलस? माझा पती बेशुद्ध झाला म्हणून जाब विचारते. तो नाटक करू लागतो पण पल्लवीच्या वारंवार खडसावून विचारल्यानंतर मात्र राकेश स्वतःचे अक्राळ रूप दाखवतो. पल्लवीच्या आकर्षक शरीर व सौंदर्याने मोहित झालेला राकेश तिच्या प्रचंड विरोधाला झुगारून बळजबरीने पाशवी बलात्कार करतो.
नंतर अगतिक,असहाय पल्लवी मोहन शुद्धीवर आल्यावर त्याला सर्व आपबिती सांगते.
राकेश व मोहन मध्ये एकमेकांना मारहाण सुरू होते प्रसंगी संधी साधून राकेश मोहनवर चाकूने वार करणार तेवढ्यात पल्लवी मध्ये येते आणि त्यात तिचा मृत्यू होतो. पल्लवीच्या अशा पद्धतीने झालेल्या मृत्यूचा मोहनच्या मनावर खोलवर परिणाम होतो अर्थातच मोहन पागल होतो.
शेठ रामेश्वर दास सर्व प्रकाराने उद्विग्न होतात.मोहनला पागलाच्या दवाखान्यात भरती केले जाते. त्याच्यात फारशी सुधारणा दिसत नाही. मोहन सुधारला पाहिजे यासाठी पल्लवी सारखी दिसणारी ,साधर्म्य असणाऱ्या सुंदर युवतीचा शोध घेण्यात येतो. डोमा आणि कोब्रा प्रयत्न करून पल्लवी सदृश्य युवतीचा शोध घेण्यात यशस्वी होतात. आई वडिलांचे लहानपणी निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या आणि भावाला ब्रेन ट्युमर असल्यामुळे पाच लाखाची अत्यंत गरज असल्यामुळे गरजू राणी या कार्यास तत्परता दर्शविते. नियमितपणे मोहनला औषधी देणे, त्याची देखभाल करणे, मनोरुग्ण मोहनच्या भावना सांभाळत त्याच्या उपचाराची काळजी घेत त्याचं मन जिंकण्यात राणी यशस्वी होते. हळूहळू मोहनमध्ये सुधारणा व्हायला लागते. परंतु संपूर्ण संपत्तीची मालकी आपल्या हाती असावी म्हणून प्रयत्नरत काजलला मात्र हे पटत नाही. त्यामुळे वहिनी काजल एक दिवस आपल्या दिराला अर्थात मोहनच्या दररोज सेवनाच्या औषधात कामोत्तेजक द्रव्य मिसळवते. त्या द्रव्याच्या सेवनामुळे मोहन कामातूर होतो . ढगांचा कडकडाट वादळ सुरू असल्यामुळे कामातूर झालेला मोहन राणीवर जबरदस्तीने बलात्कार करतो . वेडाच्या भरात त्याच्या हातून भलतंच घडलं जातं आणि नाटकामधील वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर येते. अनवधनाने मोहनकडून राणीवर बलात्कार होतो.मोहनच्या हातून नकळत झालेला प्रमाद संघर्षास कारणीभूत ठरतो.
कालांतराने मोहनमध्ये सुधारणा व्हायला लागते. पूर्वी राणीला पल्लवी समजणारा मोहन पल्लवी ही वेगळी स्त्री आहे इतपत ओळखण्यापर्यंत सुधारतो.पल्लवीचे काम संपल्याचे रामेश्वर सेठ सांगून तिला कामावरून कमी करतात परंतु पोटात तीन महिन्याचा गर्भ मोहन मुळे वाढत असल्याचे ती सर्वांसमोर सांगते .त्यावेळेस मात्र सर्वजण तिची निर्भत्सना करतात. राणी मोहन कडे मदतीची याचना करते. पागलपणातून मोहन बरा झाला पण राणीच्या बरबादीला सुरुवात कशी झाली हे ती सर्वांसमोर उद्विग्नपणे कथन करते .राणीला ती वेश्या कशी आहे, विषारी नागिन कशी आहे,तिने हे कुभांड रचल्याचा आरोप करत सर्वजण तिचा धिक्कार करतात. एक दिवस काजल पती गोपालला आपण केलेल्या कट कारस्थानाविषयी सांगते आणि हे भक्ती ऐकते. राणीची घालमेल, उद्विग्नता, तडफड आणि अस्वस्थता पाहून भक्ती काजलने केलेला प्रकार सर्वांसमोर उघड करते. राणीच्या व्यथाना वाचा फोडते .तुम्ही पाच लाख दिले पण बलात्कार करून तिला जे गरोदर केले हा तिच्यावरचा अन्याय आहे, हे सांगते .त्यावेळेस मात्र रामेश्वर यांनाही तिच्याविषयी आपुलकी वाटायला लागते. पल्लवी आयुष्यातून गेल्याचे दुःख मोहनला आहे .गोपाल काजलला खडसावतो, काजलला आपण केलेल्या दुष्कृत्याविषयी पश्चाताप होतो. दुसरीकडे राकेश चित्रकार अमन म्हणून भक्तीला आपल्या प्रेम मोह जाळात फसवतो.सेट रामेश्वर दास यांच्या कंपनीचे ५० लाखाचे नुकसान होते. काजल व्यवसायातले पैसे काढून लाखो रुपये आपल्या भावाकडे देते. परिणामी कंपनीच डबघाईस येते.
राकेश डागा यांने केलेल्या गुन्ह्यामुळे पोलिसाचा ससेमिरा त्याच्यामागे लागला असल्याने तोंड लपवून पळत राहतो. राकेश राणीचा ढाल म्हणून उपयोग करण्याचा प्रयत्न करतो. मोहन आणि राकेश यांच्यात मारहाण होत असताना मध्ये शेठ रामेश्वर दास येतात आणि चाकूने हल्ला झाल्याने त्यांचा मृत्यू होतो. एकंदर अशा स्वरूपाचे कथानक या नाटकातून दर्शविले आहे. पल्लवीचा नाहक बळी, मनोरुग्नमोहन, राणीची सुश्रुषा, काजलचा कुटील पणा, भक्तीचे प्रेम, बदफेली राकेश, कोब्रा- डोमाचा अफलातून विनोद, हतबल राणीची व्यथा इत्यादी वैशिष्ट्यानिशी साकार होणाऱ्या या नाटकातून वेडाच्या भरात भलतच घडल्यामुळे निर्माण झालेले पेचप्रसंग दर्शविले आहे. फसवणूक, स्वार्थीपणा, लालच, अत्याचार, योगायोग,साधर्म्यामुळे होणारा लाभ दर्शवणारे हे सामाजिक नाटक आहे.
नाटकातील विनोद मात्र लक्षणीय आहे. विनोदवीर प्रा.डॉ.शेखर डोंगरे , के.आत्माराम आणि पायल यांच्या जुगलबंदीने मुद्राअभिनय, अंगविक्षेप पोट धरून हसत प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो. रामेश्वरदास शेठकडे चौकीदार असलेला डोमा आणि मॅनेजर असलेला कोब्रा हे रामेश्वरच्या प्रत्येक कामात मदत करत असतात. मृत पल्लवीसारख्या दिसणाऱ्या सुंदर मुलीचा राणीचा शोध घेताना निर्माण केलेला विनोद महत्त्वाचा आहे. टंच ,धुरा- बांधी, तेल लावत जा, गरोदर- गरजू ,दारू -बिर्याणी,पैसे,राणीजी,म्हशीचा फोटो,
मनाच्या धुंदीत ही कविता, खोटी ,उपट पोरगी पाहायला गेलो चोरीचा मामला हे गीत मॅनेजरचा चौकीदार म्हशीचा फोटो,कामोत्तेजक चूर्ण विक्रेता ,फडफडती मेणबत्ती, द्याट राक्षसीन, हडद,ग्रामपंचायतीचा सांड, गावभर फिरणारी देवगाय,माझ्या दोस्ताला नाही मlराचे, औषधाचा दुष्परिणाम, मेणबत्ती पेठेचना, मेमरी अशा द्विअर्थी वैशिष्ट्यपूर्ण शब्दोच्चारणाने व प्रसंगनिष्ठ विनोदाने या तिघांच्या जुगलबंदीतून निर्माण होणाऱ्या विविध पंचमुळे प्रेक्षक हसून लोट पोट होतो. अखिल भारतीय पत्नी पीडीताच्या आमरण उपोषणाच्या प्रसंगाने विनोदाबरोबरच कौटुंबिक स्त्रियांकरवी पुरुषांना होणारे अत्याचाराची जाणीव करून देत अंतर्मुखही केले जाते. किंबहुना अत्याचाराचे स्वरूप कसे बदलत चालले आहे याची प्रकर्षाने जाणीव करून देण्यात हरहुन्नरी कलावंत शेखर डोंगरे यशस्वी ठरले.
‘भलतच घडलं वेडाच्या भरात’ या नाटकातील प्रत्येक पात्र स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणारे विलक्षण आहे.महिलांना आपल्या जाळ्यात ओढत, फसवणूक करणारा, पिपासू , स्त्री लंपट,बलात्कारी, खुनी , दुष्ट प्रवृत्तीचा नराधम राकेश डागा (चिदानंद सिडाम), व्यवसायात हातखंड असणारा सुशील, सदविचारी ,श्रीमंत उद्योगपती शेठ रामेश्वर दास (विश्वास पुडके), वडिलांचा व्यवसाय सांभाळून पल्लवीवर प्रेम करत पुढे तिच्याशी विवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणारा चॉकलेट बॉय मोहन (लोकेश कुमार),या घरंदाज कुटुंबातील सून अतिशय सुंदर, मोहक, आकर्षक पल्लवी (पौर्णिमा तायडे), मोहनची बहीण कलाप्रिय रसिक चित्रकार अमानवर प्रेम करणारी भक्ती (ज्ञानेश्वरी प्रभाकर), वडिलांचा व्यवसाय सांभाळणारा परंतु पत्नीच्या सांगण्यावरून वागणारा गोपाल (स्वप्नील बनसोड) ,दास कुटुंबातील सर्व संपत्तीचा मालकी हक्क मिळवण्यासाठी धडपडणारी, एकुलती एक राणी बनण्याची स्वप्न पाहणारी लालची,धुर्त , कावेबाज , कपटी,स्वार्थी , कट कारस्थानी काजल (मनिषा देशपांडे), परिस्थितीने हतबल असलेली ,निराधार पण नृत्यकलेत निपुण , सुंदर ,सेवाभावी,प्रामाणिक सेवारत ,मोहनजी काळजी घेत निष्ठेने देखभाल करणारी राणी ( पौर्णिमा तायडे), चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा लग्न जुळल्यामुळे आनंदात असणारा परंतु तत्कालिक अडचणींमुळे वैवाहिक सुखापासून वंचित डोमा (प्रा.डॉ. शेखर डोंगरे ),प्रयत्न करूनही वैवाहिक जीवनापासून अलिप्त राहिलेला , विवाहेच्छुक आतुर कोब्रा (कॉमेडीकिंग के .आत्माराम) , डोमाशी विवाह केलेली परंतु संशयी वृत्तीची शेवंता ( पायल) या पात्रांच्या सकस अभिनयाच्या माध्यमातून संवादाने
‘भलतंच घडलं वेडाच्या भरात’ हे नाटक फुलत जाते.
नाटकातील गीत रचना आशयवाहक व श्रवणीय आहेत.’साजणी मनमोहनी तुजविण कसा मी जगू’
,’ हाल क्या है दिलोका पूछो सनम आपका मुलाखत गजब हो गया मुस्कुराना गजब हो गया सनम’,
तेरे बिखरे बिखरे बाल’ चिदानंद सिडाम यांनी गायलेल्या गीताला प्रेक्षकांनी चांगली दाद मिळाली. झाडीतील लोकप्रिय व श्रवणीय गीताने प्रेक्षक तल्लीन झाले. ‘जगा वेगडी ही आहे ग कमाई
कुणाचेच काही इथे लोभ नाही…//धृ //
साखरेचा गोड घास भरविते तुजला
स्वप्न दाखवी ते खुणावून मजला
जीवन हे माझे तुझ्यासाठी वाही
कुणाचेच काही इथे लोभ नाही
जगा वेगळी ही………//1//
कुणा वेदना ह्या माझ्या कळे ना
दुःख काय माझे तुला आठवे ना
असा काळ माझ्या नशिबी का येई
कुणाचेच काही इथे लोभ नाही
जगा वेगळी ही……..//2//
वाळून ज्याची पाने गळाली
घालून पाणी अश्या फुलवेली
फुलवून गेली ग तूच ठाई ठाई
कुणाचेच काही इथे लोभ नाही
जगा वेगळी ही आहे……//3//
स्वरबहार स्वप्निल बन्सोड यांचे नाटयाश्य सूचित करणारे पार्श्वगीत व सुमधुर गायनाने चांगलीच रंगत आणली.गीतांना मास्टर हिरा मडावी,मास्टर रक्षित रामटेके,आणि मास्टर धम्मदीप यांची उत्तम संगीत साथ लाभली .प्रतीक आर्टचे नेपथ्य, विजय साऊंड सर्विसची ध्वनी व प्रकाश व्यवस्था आणि मिलिंद गोगले व नागसेन मेश्राम यांच्या प्रयोग सहाय्यामुळे नाट्यप्रयोग यशस्वी ठरला.
सर्व कंपनी आपल्या मालकीची करण्याकरिता षडयंत्र रचणारी कावेबाज काजल- मनीषा देशपांडे हिचा वाचिक अभिनय उठावदार होता. पागलपणा कायिक अभिनयातून लोकेश यांनी उत्तम दर्शविला. कला केंद्रातील नृत्यांगना राणी हिचा वैशिष्ट्यपूर्ण अदा ,मुजरा व नृत्य तसेच पागल व्यक्तीला सांभाळण्याचा , भलतच घडल्यावर समर्थपणे तोंड देण्याचा व आपली व्यथा स्पष्ट मांडण्याचा तथा ठोसास ठोस उत्तर देणाऱ्या राणीचे जिकिरीचे पात्र बोलके डोळे व चेहऱ्यावरील हावभावाने पौर्णिमा तायडे हिने जबरदस्त साकारले.
मौत का डर ना जिंदगी की परवाह असा
पाशवी नराधम राकेश डागा याची भूमिका भारदस्त आवाज व करारीपणाने चिदानंद सिडाम यांनी उत्तम वठवली. प्रा.शेखर डोंगरे , के.आत्माराम यांचा बहारदार अभिनय , पायल चा बिनधास्त पणा व ज्ञानेश्वरी प्रभाकर हिच्या दिलखेचक नृत्यामुळे प्रेक्षकानी नाटकाचा मनमुराद आस्वाद घेतला .एकंदर सर्वच कलावंत हे कसलेले असल्यामुळे त्यांच्या अभिनयाच्या बळावर नाटक यशस्वी झाले
नाटकातील संवादही महत्त्वपूर्ण आहे.’ पोटाची भूक आणि जीवावरच संकट वाटेल ते करायला भाग पाडते’ ,प्रेमाने जवळ घेणारी माणसेही प्रसंगी विकृत वागतात. भलतंच घडलं वेडाच्या भरात तर मग काय होईल या घरात,’ मौत का डर ना जिंदगी की परवह ,’राकेश पागलपणातून मोहन बरा झाला पण राणीच्या बरबादीला सुरुवात झाली.’असे प्रभावी संवाद आहेत.नाटकाचे कथानक सामान्य असूनही सर्वच कलावंतांचा कसदार अभिनय, कलाटणी तंत्र व धमाल विनोदामुळे या नाटकाचे सादरीकरण उत्तम झाले.
प्रा. राजकुमार मुसने, गडचिरोली