ताज्या घडामोडी

त्या मार्गाना राज्य महामार्ग दर्जा देऊन विकसित करा. 

ग्रामीण रस्त्याचा होईल विकास ; गावे जोडली जातील एकमेकांना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजुरा क्षेत्रात तीन राष्ट्रीय महामार्ग, सहा राज्य महामार्ग आहेत. परंतु राजुरा कोरपना जिवती गोंडपिंपरी या चारही तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातून जाणाऱ्या मार्गांना राज्य महामार्गाचा नव्याने दर्जा मिळून मार्गाचा विकास होणे अपेक्षित आहे.

यात कोठारी–तोहोगाव- विरूर स्टेशन–वरूर-अहेरी–खामोना, गोवरी–चिंचोली- निमणी–बाखर्डी – नांदा–आवारपूर-कढोली खुर्द–नारंडा-पिपरी–कोडशी खु- कोडशी बुद्रुक–तुळशी- जेवरा–अकोला-पारडी–कोठोडा – परसोडा–राज्यसीमा (मागरुळ),

राज्यसीमा–बाबापुर-भारी–मराई पाटण–टेकामांडवा- धनकदेवी–धानोली- येरगव्हाण–चनई खु.,

जिवती- कोदेपूर – येल्लापूर–राज्यसीमा, कन्हाळगाव–सावलहिरा- येल्लापूर–वणी बूज–महाराजगुडा- शंकरलोधी,बल्लारपूर- सास्ती–रामपूर- राजुरा–चुनाळा, सातरी–विहीरगाव- अनुर अंतरगाव, विरूर स्टेशन–राज्यसीमा, सावलहिरा–मांडवा चौपाटी- जांभुळधरा–उमरहिरा- मांगलहिरा–थिप्पा–राज्यसीमा, मुकुटबन–खडकी- अडेगाव–खातेरा, पारडी–रूपापेठ- उमरहिरा , गडचांदूर – नैतामगुडा – इजापुर – बेलगाव – चिंचोली –

पिपरडा – कारगाव बूज – धानोली – बोरगाव खू – कातलाबोडी – कोरपना

हे प्रमुख मार्ग आहेत.

यातील काही मार्ग पूर्णतः एकमेकांना जोडले सुद्धा गेले नाहीत. त्यामुळे थेट प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. हे मार्ग सुलभ झाल्यास या अतीदुर्गम आदिवासी बहुल भागात दळणवळणाची चांगली सोय होऊन विकासाची क्रांती होईल. त्यामुळे या मार्गांना राज्य महामार्ग म्हणून घोषित करून त्यांचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये