महात्मा गांधी महाविद्यालयात संत सेवालाल महाराज जयंती व संविधान गौरव दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयामध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती व संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला.
संपूर्ण भारतीय समाजाच्या उत्थानासाठी संतांचे योगदान महत्त्व महत्त्वाचे आहे. त्यापैकी एक संत म्हणजे संत सेवालाल महाराज, संत सेवालाल महाराजांनी समाजातील अनिष्ट रूढी व परंपरांना फाटा देत नव्या व आधुनिक युगाच्या निर्मितीसाठी समाजामध्ये काम केले. अशा संत सेवालाल महाराजांची जयंती संविधान गौरव महोत्सव निमित्त मा. श्री. धनंजय गोरे, सचिव, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री रामकृष्ण पटले आपल्या भाषणात म्हणाले की भारत ही संतांची धरती आहे.
त्यात थोर असे महापुरुष होऊन गेले अशा महापुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासारखे ग्रंथ लिहून संपूर्ण भारतीय समाजाला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजनैतिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांना एका मळ्यात गुंफण्याचे काम केले. महाराष्ट्र शासनातर्फे आदेशित संविधान गौरव महोत्सव साजरा करताना त्यांनी भाषण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री मनोहर बांद्रे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री चेतन वैद्य यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजर होते