ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषदेमार्फत गावातील कचरा शहराच्या बाहेर टाकत असल्याने होत असलेल्या प्रदुर्षन मुळे नागरिक त्रस्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर नगर परिषदेमार्फत गावातील कचरा शहराच्या बाहेर राजुरा रोडवरील पेट्रोल पंप जवळ गावातील कचरा मृत जनावरे टाकत असल्याने परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी तसेच धूर चा त्रास होत आहे, या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, याच भागात हॉटेल हिल टॉप असल्याने हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांना प्रदूषणाचा त्रास होत आहे.

हॉटेल च्या संचालिका श्रीमती आरजू आगलावे यांनी नगर परिषदेकडे होत असलेल्या प्रदूषणाबाबत तक्रार 24 जानेवारी रोजी केली असून या परिसरात कचरा मृत जनावरे टाकू नये अशी मागणी केली आहे. मात्र अजूनही कचरा टाकत असल्याचे कळते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये