वर्धा पोलीसांनी ६२ आरोपीतांकडुन केला १३ लाख रु. दंड वसुल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता तसेच सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवणे करीता प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असते, आरोपी यांचे कडुन त्यांच्या चांगले वर्तवणुकीबाबत व त्यांचेकडुन कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याकरीता कलम १२६ बि.एन.एस.एस. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात येते. तसेच गुन्हेगार यांचेकडुन भविष्यात गुन्हे टाळण्याकरीता व सार्वजनीक शांतता राखणे करीता कलम १२९ बि.एन.एस.एस. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात येते. वरील दोन्ही प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये आरोपी गुन्हेगार यांचेकडुन चांगल्या वर्तवणुकी बाबत बंधपत्र (बाँड) लिहुन घेतले जातात. ज्या आरोपीने गुन्हेगाराने बंधपत्रामधील अटी शर्तीचे उल्लंघन केल्यास त्याचेवर बंधपत्र भंग (ब्रिच ऑफ बाँड) कारवाई करुन त्याचेकडुन अटी प्रमाणे दंड वसुल केला जातो.
सन २०२४ मध्ये कलम १२६ बि.एन.एस.एस. अन्वये संपुर्ण वर्धा जिल्ह्यात एकुण ६७४३ केसेसे करण्यात आलेल्या असुन कलम १२९ बि.एन.एस.एस. अन्वये संपुर्ण वर्धा जिल्ह्यात एकुण १३१७ केसेस करण्यात आलेल्या आहे, गतवर्षात वर्धा जिल्ह्यातील एकुण ६२ गुन्हेगार आरोपी यांनी प्रतिबंधक कारवाईचा बंधपत्र (बाँड) मधील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी बंधपत्र भंग (ब्रिच ऑफ बाँड) कारवाई करुन त्यांचेकडुन एकुण १३ लाख १० हजार रुपये दंड स्वरुपात वसुल करून शासन जमा करण्यात आले आहे. तसेच भविष्यात वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता सराईत गुन्हेगार/हिस्ट्रीशिटर गुन्हेगार यांचे विरुध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक डी. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, सफौ. कैलास सोनवणे, पोहवा. अभिजित वाघमारे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.