वनतलावाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल !
थातुरमातूर कामे करून निधी उकळण्याचा प्रकार ; पावसाळ्यात कामे करण्याचे कारण काय?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- उन्हाळ्यात जंगली प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होवू नये. तसेच पावसाळ्यात जंगलातील माती व पाणी वाहून जावू नये यासाठी शासन जंगलात वनतलाव, अनघड बंधारे बांधण्यासाठी पानलोट समितीच्या माध्यमातून वनविभागाला कोट्यावधी रूपयांच्या निधीचा पुरवठा करित सदर योजनेची प्रभावीपणे अंमलबाजावणी करून पारदर्शक कामे करावयाचे असताना जिवती तालुक्यात माञ उन्हाळ्यात करावयाची कामे पावसाळ्यात थातूर मातूर करून शासन निधी लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणाऱ्या वनविभागानेच कंञाटदाराच्या माध्यमातून पोकलँडच्या साह्याने झाडांचा नायनाट करून वनतलाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आता वनविभागावर कार्यवाही कोण करणार असा सवाल जनतेतून येत आहे.
जिवती वनपरिक्षेञातील वणी वनक्षेञातील नारपठार,लांबोरी, कोदेपूर,करणकोंडीसह विविध गावात प्रधानमंञी सुक्ष्म सिंचन योजने अंतर्गत पानलोट समिती व वनविभागाकडू मृद संधारणाची कामे करण्यात येत आहेत.सदर कामे हे पावसाळ्यापुर्वी करणे गरजेचे होते. कारण हि कामे उन्हाळ्यात झाली असती तर जंगली प्राण्यांना यातून पिण्याच्या पाण्याची सोय झाली असती.हे माहित असताना सुध्दा वनविभागाने मृद संधारणाची कामे उन्हाळ्यात करण्यासाठी जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले आणि आता भर पावसाळ्यात कामे सुरू केली आहे.यातील अनेक अनघड बंधारे पाण्यात वाहून गेल्याची ही माहिती समोर आली आहे.थातूरमातूर केलेले खोदतळे मोजमाप घेण्यापूर्वीच पाण्याने भरले गेले असून वनविभाग आता कशाच्या आधारावर बिले काढणार हा प्रश्न आहे. पावसाळ्यात काम सुरू करण्याचे कारण काय याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रस्तुत प्रतिनिधीने विचारणा केली असता सदर कामातील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडणार या भितीने हि कामेच आमची नाही कृषी विभागाची कामे असल्याचे सांगून मोकळे झाले. माञ पावसाळ्यात करित असलेली संपूर्ण कामे पाणलोट समिती व वनविभागाची असून सदर कामाचे बिल सुध्दा पानलोट समिती वनविभागाच्या हस्ताक्षरांनेच कंञाटदारांना बिले अदा होणार आहेत.
जंगली प्राण्यांना फायदा होणार काय?
उन्हाळ्यात जंगली प्राण्यांना जंगलात पिण्यास पाणी मिळत नसल्याने प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत आणि भटकी कुञाच्या तावडीत त्यांचा हाकनाक जीव गमवावा लागतो हा सर्व प्रकार टाळण्यासाठी सरकार संबंधित विभागामार्फत जंगलात खोदतळे (वनतळे) निर्मितीसाठी लाखो रूपये खर्च करतो परंतु अधिकाऱ्यांच्या खाऊगिरीमुळे कंत्राटदार सदर कामे थातूरमातुर करून मोकळे होत असून सदर खोदतळ्याचा फायदा उन्हाळ्यात जंगली प्राण्यांना होणार काय?असा सवाल आता वनप्रेमीकडून व्यक्त केले जात आहे. कमिशनच्या नादात वनविभागाने पावसाळ्यात सुरू केलेल्या मृद संधारणाच्या कामाचे उच्चस्तरीय चौकशी करून दोषी वनअधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
पोकलँड गावातून नेल्याने रस्त्याचे नुकसान
मृद संधारणाची कामे पावसाळ्यात करण्यासाठी घाई वनविभाग करित असल्याने संबंधित कंञाटदाराने पोकलँड नारपठार येथील सिमेंट रस्त्यावर घेऊन गेल्याने सिमेंट रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याचे गावकरी सांगत असुन रस्ता दुरूस्त करून देण्याची मागणी केली जात आहे.
सदर गावातील जंगलात सुरू असलेली मृद संधारणाची कामे वनविभागाची नाहीत. व त्या कामाचा वनविभागाशी काहीही संबंध नाही हि संपूर्ण कामे कृषि विभागाची आहेत.
– संदिप लंगडे
वनपरिक्षेञ अधिकारी जिवती.