केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे गोर गरीब जनतेकडे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
केंद्रात मंत्रीपद असुनही रामदास आठवलें यांचे गोर गरीब सामान्य जनतेकडे दुर्लक्ष आहेत
संविधानिक पदावर असुनही सामान्य जनतेची समस्या सोडवु शकत नसाल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
सामान्य जनता आपल्या समस्या सरकार समोर मांडतात, परंतु सरकारमधील काही मंत्री जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात.
आता यात त्यांचा दोष आहे की त्यांच्या जिल्हाध्यक्षांचा, याची तपासणी होणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती स्वताची किंवा ईतर समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु मधात बसलेले त्यांचे कार्यकर्ते साधारण जणतेची समस्या मंत्री रामदास आठवले यांचे कडे जाऊचं देत नाहीत. आठवले यांनी देशातील आपल्या सर्व जिल्हाध्यक्षांची ऐक बैठक बोलावून यावर चर्चा करायला हवी
ऐक असो कि अनेक सर्व सामान्य जनतेची समस्या जाणून घेणे आणि ती समस्या सोडविणे हे आपले कर्तव्य आहे अशी सूचना व आदेश द्यायला हवे.
अन्यथा साधारण जनतेच्या मनात आक्रोश निर्माण होईल. अशी भीती वाटत असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.