शहरातील समस्यांबाबत राजुरेड्डी यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घूस (चंद्रपुर) : शहरातील वाढत्या नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपरिषद शहराच्या विकास कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केला आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांसह नगरपरिषद मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांची भेट घेऊन समस्यांबाबत निवेदन दिले. यावेळी शहरातील प्रमुख समस्यांवर चर्चा करण्यात आली.
जर समस्या सोडविल्या नाहीत, तर काँग्रेस पक्ष आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मुख्य समस्यांवर मागण्या:
1. पार्किंग सुविधा: आठवडी बाजारासाठी पार्किंगची सोय करावी.
2. रस्ते दुरुस्ती: वळण रस्त्यावर मुरूम किंवा ओबी टाकणे, तसेच खोदलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती.
3. पाणीपुरवठा: फुटलेल्या पाईपलाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.
4. नाल्यांची दुरुस्ती: तुटलेल्या नाल्यांची दुरुस्ती व नवीन नाल्यांचे बांधकाम.
5. पथदिवे चालू करणे: अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत, ते दुरुस्त करणे.
6. स्वच्छता: कचराकुंड्या आणि रस्त्याच्या बाजूचे कचरा, झुडपे स्वच्छ करणे.
7. वाचनालय आणि शौचालय: बंद स्थितीत असलेल्या शासकीय वाचनालय व शौचालये चालू करणे.
8. अंगणवाडी आणि बाल उद्याने: स्वच्छता आणि दुरुस्ती.
9. डास निर्मूलन: शहरात जंतूनाशक फवारणी करून डासांचा प्रकोप कमी करणे.
10. रुग्णालय परिसर: रस्त्याचे बांधकाम, नाल्यांची दुरुस्ती, पथदिवे चालू करणे आणि रस्त्यावर ब्रेकर बसवणे.
मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन:
या सर्व मागण्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येतील, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
जर यावर त्वरित कार्यवाही झाली नाही, तर नागरिकांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशाराही राजुरेड्डी यांनी दिला.