ताज्या घडामोडी

अर्हेरनवरगाव ग्रामपंचायत च्या कारभाराची चौकशी करा

ग्रामपंचायत सदस्यांची मागणी

 

चांदा ब्लास्ट :

ब्रह्मपुरी:-
ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत मध्ये येणारी अर्हेरनवरगाव ग्रामपंचायत आहे. येथील इतिहासात कधी नव्हे मात्र आता या ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून ग्रामपंचायतच्या रकमेची अफरातफर करत येथील सरपंच दामिनी जागेश्वर चौधरी व सचिव रातीराम चौधरी हे मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.अशी मागणी अर्हेरनवरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी, मुख्याधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनातून केली.
अर्हेरनवरगाव येथील सरपंच सौ.दामिनी जागेश्वर चौधरी व ग्रामविकास अधिकारी रतिराम चौधरी यांनी एकमेकांच्या संगनमताने ग्रामपंचायत कारभारात घोळ करून कामावर न आलेल्या विविध व्यक्तींच्या नावे खोटे मस्टर तयार करून हजारो रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले व ते पैसे संबंधित व्यक्तींकडून वसूल करून अफरातफर केल्याने सरपंच व सचिव यांनी केलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दैनंदिन गुजरी व आठवडी बाजार दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लिलाव करण्यात आला मात्र लिलाव झाल्यानंतर संबंधित लिलावधारकाने झालेला ठेका काही दिवसांनी सोडला त्यानंतर 4 ते 5 दिवस ग्रामपंचायत मार्फत वसुली सुरू करण्यात आली नंतर मात्र ग्रामपंचायत चा ठराव न घेता सरपंच दामिनी चौधरी व सचिव रातीराम चौधरी यांनी सरपंच दामिनी चौधरी यांचे वडिल ऋषी बठे यांना परस्पर कोणताही ठराव अथवा स्टॅम्प न लिहिता ठेका देण्यात आला.व वसुली सुरु केली याची याबाबत ची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.ग्रामपंचायत ला लागणारे साहित्य हे कोणतेही जाहिरात किव्वा चावळीवर नोटीस न लावता ग्रामपंचायत सचिव आपसी संबंधांतून व आर्थिक व्यवहार करून बाजारभावापेक्षा जास्त दराने दरपत्रक आनुन ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये मंजूर न करता स्वमर्जीने खरेदी करत आहेत. ग्रामपंचयत एजन्सीच्या नावाखाली ठेकेदारी पद्धतीने कमी दरात गावातील बांधकामाचे काम करत असून त्याचा नफा ग्रामपंचायतच्या सामान्य फंडात जमा करण्यात येत नसून स्वतः जवळीक व्यक्तींच्या नावावर पैसे उचलून स्वतःचे खिशे भरण्याचे काम येथील सरपंच व ग्रामसेवक करीत आहेत.ग्रामपंचयत कार्यालयात पाणीपुरवठा शिपाई असतांना सरपंच दामिनी चौधरी यांनी स्वतःच्या भावालाच मासिक वेतनावर पाणीपुरवठा करण्यासाठी नेमणूक केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
ग्रामपंचायत सामान्य फंडातून देण्यात येणाऱ्या 5 टक्के अपंग निधीचे सचिव व सरपंच यांनी कसलाही ठरव अथवा ग्रामसभा न घेता परस्पर फक्त 4 व्यक्तींना पैसे वाटप केले असून इतर अपंग व्यक्तींना डावलण्यात आले.याबाबद मासिक सभेत विचारणा केली असता शासनाकडून फक्त चार व्यक्तींना निधी देण्याचा परिपत्रक आला असल्याचे सांगितले मात्र परिपत्रक मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली.ग्रामपंचायत सदस्य सविता राहुल देवढंगले ह्या जवळपास दीड वर्षांपासून कोणतीही पूर्व कल्पना न देता मासिक सभेला गैरहजर असताना तिला अपात्र करण्याचा ठराव पारित असून सुद्धा वरिष्ठांकडे त्याची माहिती पाठविली नाही.याबाबद मुख्याधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांची प्रत्येक्षात भेट घेतली असता कसलाही अहवाल सादर न केल्याचे सांगितले.याबाबद येथील सचिव रातीराम चौधरी यांनी विचारणं केली असता त्यांनी मला वेळ मिळेल तेव्हा मी अहवाल पठावेन असे मासिक सभेत सांगितले.
ग्रामपंचयत कार्यालयात दाखल्यांसाठी किव्वा वैयक्तिक कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी येथील ग्रामसेवक मोठ्याने बोलून सर्वसामान्य माणसाचं आवाज दाबण्याचा प्रयत्न करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.व दाखल्यांसाठी दिवसेंदिवस ताटकळत राहावे लागते.कोणतेही कारण नसताना येथील सचिव आपल्या पदाचा पूर्णतः गैरवापर करून गावातील नागरिकांना नोटीस पाठवून मानसिक त्रास देत आहेत.एकंदरीत येथील ग्रामपंचायत सरपंच दामिनी जागेश्वर चौधरी व सचिव रातीराम चौधरी हे कोणतेही ठराव न घेता मनमर्जीने ग्रामपंचायत कारभार करत असून लाखो रुपयांची अफरातफर करून भ्रष्टाचार करत मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाही करण्याची मागणी केली असल्याची माहिती येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिलारे,जितेंद्र कऱ्हाडे,प्रतिभा राऊत,ज्ञानेश्वरी ठेंगरे,निशा ठेंगरे,चंद्रकांत गाताडे,सरिता उरकुडे यांनी ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये