Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करणारा ‘भद्रावती पालिकेचा घनकचरा प्रकल्प’

गांडूळ व सेंद्रिय खताची निर्मिती करून होते विक्री : निर्मितीतून पालिकेने केली 3 लाखाची कमाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

भंगार वस्तू पासून आकर्षक वस्तूंची निर्मिती

        शहरातील कचरा उचलून शहर स्वच्छ करणे व त्यासोबतच त्या कचऱ्यापासून खत निर्मिती करून त्यापासून पालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे हा उद्देश समोर ठेवून राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक पालिके अंतर्गत घनकचरा प्रकल्पाची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवली. यात राज्यातील अनेक नगरपालिका अपयशी ठरल्या मात्र भद्रावती नगरपालिकेने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून गांडूळ व सेंद्रिय खतांची निर्मिती करून त्याची विक्री करून शासनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. याशिवाय कचऱ्यात आलेल्या भंगार वस्तू पासून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून एक नवा आदर्श इतर पालिकांपुढे ठेवला आहे. या उत्कृष्ट कार्यामुळे भद्रावती नगरपालिका ही अवघ्या राज्यात दखलपात्र ठरली आहे.

             राज्य शासनाच्या संकल्पनेनुसार सन 2016 साली तत्कालीन नगराध्यक्ष अनिल धानोरकरांच्या नेतृत्वात शहरातील विंजासन टेकडीच्या कुशीत निसर्ग रम्य जागेवर घनकचरा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली .भद्रावती शहरातील 11 प्रभागातील कचरा उचलण्यासाठी दहा घंटा गाड्यांची व्यवस्था करून ठेकेदारींच्या माध्यमातून शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या घंटा गाड्यांद्वारे शहरातील सर्व प्रभागातील दररोज 14 टन ओला व सुका कचरा उचलण्यात येऊन तो घनकचरा प्रकल्पामध्ये गोळा केल्या जातो. प्रत्यक्षात या दोन्ही प्रकारच्या कचऱ्याचे विलगीकरण करून व त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्यापासून गांडूळ व सेंद्रिय खतांची निर्मिती केल्या जाते व त्यांची विक्री केल्या जाते. आज पर्यंत पालिकेने तब्बल 3 लाख 3 हजार 750 इतके रुपयांच्या खतांची विक्री केलेली आहे. या घनकचरा प्रकल्पात दुर्गंधी येऊ नये म्हणून हा परिसर अत्यंत आकर्षक करून परिसरात एक सुंदर बगीचाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये एक गुलाब- मोगरा यांच्या खास बगीचांची निर्मिती करण्यात आली आहे. या आकर्षक परिसरामुळे येथील घनकचरा प्रकल्प हे पर्यटकांचे ही आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

याशिवाय कचऱ्याच्या माध्यमातून गोळा झालेल्या भंगार वस्तू पासून आकर्षक खुर्च्या ,बेंचेस तथा विविध प्रकारच्या शोभवंत वस्तूंचेही निर्मिती करण्यात आल्यामुळे हा प्रकल्प म्हणजे “आम केआम घृठली योकेभी दाम” असे झाले आहे .थोडक्यात शहरातील घाण नाहीसी तर झालीच शहराच्या पर्यावरणावर देखील लाभ मिळाला व पालिकेला निश्चित असे उत्पन्नही सुरू झाले, असे तिहेरी उद्दिष्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून साध्य झालेले आहेत .या आदर्श घनकचरा प्रकल्पाला केंद्र शासनाकडून स्वच्छ संरक्षण अंतर्गत राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिकही प्राप्त झालेले आहे.

भद्रावती पालिकेचा आदर्श इतर पालिकांनी घेऊन कार्य केल्यास शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल एवढे मात्र नक्कीच!

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये