शेतकरी मित्रांना पदावर कायम ठेवून मानधनात वाढ करा
शेतकरी मित्र संघटनेचे तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे
भद्रावती तालुक्यात शेतकरी मित्र हे गेल्या पंधरा वर्षांपासून कृषी विभागाचे काम करीत आहे.मात्र त्यांना केवळ एक हजार रुपये महिना एवढे अत्यल्प मानधन देण्यात येत आहे. हे सर्व मानधन काम करताना प्रवासासाठीच खर्च होत असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचे जवळ काहीच ऊरत नाही. ही समस्या लक्षात घेऊन शेतकरी मित्रांना पदावर कायमस्वरूपी ठेवून त्यांना पाच हजार रुपये मासिक मानधन द्यावे.
अशी मागणी शेतकरी मित्र संघटना भद्रावती यांनी यांनी तहसीलदार तथा तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शेतकरी मित्र हे शासन व शेतकरी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असून ते आपापल्या कार्यक्षेत्रात शासनाच्या विविध योजनांची व लाभांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवीत असतात. निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष राजेश सोनटक्के यांचे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.