
चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस नगरपरिषदेची स्थापना २०२० साली झाली असून नगरपरिषदेची स्थापना होऊनही घुग्घुस शहराचे सिटी सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. तसेच नागरिकांच्या कोणत्याही समस्येवर तोडगा न निघाल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे घुग्घुस नगरचा सिटी सर्व्हे झाला तर नागरिकांना स्थानिक पातळीवर कामे करणे सोयीचे होणार आहे.
असेच एक निवेदन माजी जिल्हाध्यक्ष पवनकुमार आगदरी (चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभाग) यांनी गुरुवार, ०५.१२.२०२४ रोजी दिले आहे.