गुन्हेमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यात महिलेचा खून

आईला वाचवण्यासाठी मुलाने धाव घेतली असता, तोही जखमी

चांदा ब्लास्ट :—————————————————-

चिमूर येथून जवळच असलेल्या आंबोली येथील एका इसमाने ४५ वर्ष महिलेचा खून करून मुलाला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. शारदा दयाराम वाघ असे मृतक महिलेचे नाव आहे तर मोहन दयाराम वाघ (२८) असे गंभीर जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे.

आंबोली येथील आबादी प्लॉट बस स्थानक परिसरात राहत असलेले विधवा महिला शारदा दयाराम वाघ मुलगा मोहन हे दोघेही आपल्या घरी झोपडी उभारण्यासाठी खड्डे खोदत असताना बाजूनेच राहत असलेले गोपीचंद सम्पत शिवरकर या आरोपीने भांडण सुरू केले. हे भांडण विकोपाला गेल्याने आरोपींने बैलबंडीची उभारी घेऊन शारदा दयाराम वाघ हिच्या डोक्यावर वार केला. यात ती गंभीररित्या जखमी झाली. त्यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. आईला वाचवण्यासाठी मुलाने धाव घेतली असता, तोही जखमी झाला. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये