Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुळजापूर भागात ओला दुष्काळ जाहिर करा 

शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा च्यावतीने तहसील दार यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे

गेल्या तीन चार दिवसापासून देऊळगाव राजा महसूल मंडळामध्ये तुळजापूर येथे अतिवृष्टी झाली असून अद्याप शेतकऱ्यांना शासनाकडून कुठलेही मदतीचे आश्वासन मिळाले नाही.सरपंच पती श्री नारायण गीते व शेतकरी योद्धा कृषी समिती बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने दिनांक ३० सप्टेंबर रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन या मंडळामध्ये दिनांक 23/9/2024 ते 25/9/2024 या तीन दिवसा दिवसांपासून तुळजापूर मंडळामध्ये सतत तीन दिवस अतिवृष्टी झालेली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने घेतला हिरवून आता जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यापुढे उपस्थित राहिला आहे ,सोयाबीनचे नुकसान 100% झाल्याचे दिसत असून कपाशीचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याला या नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे योग्य ती कारवाई करून सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्याला कशी मिळेल यासाठी आपण स्वतः तात्काळ पाठपुरावा करावा अशी विनंती शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक श्री गजानन जायभाये व सरपंच पती श्री नारायण गीते साहेब यांनी केली असून या परिसरामध्ये दिनांक 24 सप्टेंबर रोजी 31.5 मिली व दिनांक 25 सप्टेंबर 67.5 मिली दिनांक 26 सप्टेंबर 38.8 मिली पाऊस पडला आहे.( रेनफॉल रिपोर्टनुसार )जर आपण या अतिवृष्टीची माहिती शासनापर्यंत पोहचवली नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश दिले नाही तर

मंडळातील सर्व शेतकरी येत्या तीन दिवसांमध्ये धरणे आंदोलन करणार आहे, असे निवेदनात म्हटले यावेळी सरपंच पती श्री नारायण गित्ते योद्धा कृती समितीचे समन्वयक गजानन जायभाये व शेतकरी नारायण गीते साहेब केशव मानटे. प्रल्हाद महाराज गीते. गजानन जायभाये. संदीप खरात. बाळू खरात संतोष नागरे व इतर शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये