चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबविला स्वच्छ भारत अभियान उपक्रम
स्वच्छतेचा मंत्र ध्यानी धरा, आरोग्य आपले निरोगी करा
चांदा ब्लास्ट
स्वच्छ भारताचे स्वप्न सर्वप्रथम संत गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांनी पाहिले होते. त्यांचा वसा पूढे चालवत दि. १८/०९/२०२४ ला चांदा पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान राबविले.
गणेश विसर्जनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नदी, तलावांचा परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम शालेय मंत्री मंडळातील विद्यार्थी व शिक्षकांनी राबविला.
सध्या सर्वत्र कच-याचे प्रमाण, अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे सर्वांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.
देशाचे भावी नागरिक म्हणून आपण आपले हक्क व कर्तव्य बजावले पाहिजे याची जाणिव विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे ही शाळेची जबाबदारी असते. याची सुरूवात स्वतः पासूनच करायला हवी तरच आपला परिसर, आपले शहर आणि आपला देश स्वच्छ, सुंदर होऊ शकेल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच स्वच्छ भारत अभियान उपक्रमाचे आयोजन शाळेने केले.
या उपक्रमाकरिता शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी पाठींबा दिला. उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्रकल्प प्रमुख रोशना हजारे, फहीम शेख, महेश गौरकार, ज्योती बिलोरिया या शिक्षकांनी सहकार्य केले.