काजिपेठ-अजनी पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू करा – तिरुपती पोचम गोडुगु
चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे लोक राहतात आणि तेलुगू भाषिक लोकही मोठ्या संख्येने राहतात. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाहिले तर येथे 3 लाखांहून अधिक लोक राहतात.
अजनी-काजीपेठ ट्रेनने मी किती वर्षे प्रवास करत आहे ते मला माहीत नाही. मात्र कोरोनाच्या काळात ही रेल्वे सेवा सरकारने बंद केली होती. याचा थेट परिणाम या सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर झाला असून, आता या लोकांना काजीपेठ-अजनी दरम्यान ये-जा करताना अडचणी येत आहेत.
तरी या समस्येवर लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत, तरच सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. अशी मागणी राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) जिल्हा सरचिटणीस तिरुपती पोचम गोडुगु यांनी चंद्रपूर-वणी-अरणी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली.