Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जामगावंला जाण्यासाठी अजूनही रस्ता पोहचला नाही 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 कोरपणा तालुक्यातील अपरिचित गट ग्रामपंचायत बेलगाव आदिवासी वस्ती जामगाव येथे स्वातंत्र्यानंतरही जाण्यासाठी रस्ता पोहचला नाही .बेलगाव पासून दोन किमी अंतर दोन तीन नाले पार करून डोंगर पायत्याशी असलेल्या जामगाव वासियाना जाण्यासाठी याताना भोगाव्या लागत आहे.पावसाळ्यात नाल्याना पूर तसेच नाल्याला पूल नसल्यामुळे जाणेयेने कढीन या बिकट परिस्थिती मध्ये जीवन जगत आहे.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्य कोरपणा पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी विजय पेंदाम व तत्कालिन तहसीलदार रणजित यादव ( आय ए एस ) यांनी जामगाव ला भेट दिली आदिवासी बांधवाच्या समस्या जाणून घेतल्या व स्वातंत्र्याच्या 75 वर्षात विद्युत,पाणी, सिमेंट रोड,घरकुल शासणाच्या इतर,सुविधा उपलब्ध करून दिल्या.

मात्र जान्यायेण्यासाठी रोड मिळाला नाही त्यामुळे आजही जामगाव वासि बिकट रस्तांनी जात आहे.तरी शासणा कडून रोड व नाल्यावरील पूल केव्हा होईल अशी आस जामगाव वासीय धरून आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये