रामगिरी हा देशद्रोहीच… देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – महेंद्र मुनेश्वर
रिपाइं (ए) ची धरणे आंदोलनातून मागणी!
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
त्या मनुवादी रामगिरीला मोदी-शिदे-फडणविस या त्रिकुट सरकारने पोलिस पाठबळ व स्वरक्षण देऊ नये.रामगिरी हा महाराज नाही तर पाखंडी व देशद्रोहीच आहे,त्यामुळे या पाखंडी रामगिरीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी हिंदुत्ववाद तसेच रामगिरीच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतांना व प्रखर प्रहार करताना संबोधित केले आहे.
समाजा – समाजात उद्रेक व दंगे घडऊन आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामगिरी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी त्वरित अटक करावी अशी मागणी रिपाइं (ए) तर्फे महेंद्र मुनेश्वर यांनी मुस्लिम सोशल फोरम एकता धरणे आंदोलन या सभेत केली.हिंदुत्ववादी हे भारतीय समाज व्यवस्थेला घातक आहेत.असेही ते म्हणाले.
मुस्लिम धर्माचे संस्थापक,धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्यावर अश्लाघ्य टीका करून महाराष्ट्रात दंगली पेटविण्याचे षडयंत्र करणाऱ्या धर्मांधवादी रामगिरीला अटक करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम सोशल फोरम,भारतीय लोकशाही अभियान,भारत जोडो अभियान व इंडिया अलाइंस-महाविकास आघाडी तसेच पुरोगामी विचारांच्या संघटना यांच्या तर्फे दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत आयोजित केलेल्या,केंद्र व राज्य सरकारने रामगिरी याला स्वरक्षन देऊ नये,जातीयवादी रामगिरीला देशद्रोही म्हणुन प्रयचित्तच द्यावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते.हजारोंच्या संख्येने जनता धर्मनिरपेक्ष लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी झाली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे जिल्हा प्रमुख महेंद्र मुनेश्वर,समाधान पाटील,सुभाष कांबळे,सुधिर सहारे,रुपेश नागदिवे,अंकीत रामटेके,रामचंद थूल,प्रविण कांबळे,अरविंद भगत,गोवर्धन नगराळे,धीरज मेश्राम,प्रविण साठे,नंदु वासनिक,निरज ओंकार,सुहास भस्मे,जगदिश मून,गजानन नाखले,जयकांत पाटील,किशोर फुसाटे आदी रिपाइं (ए) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच मूर्ख रामगिरीचा तीव्र निषेध केला.