ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्राचलम ते बल्लारपूर सिंगरेनी पॅसेंजर शुरु करा : महिला जिल्हा सचिव पदमा त्रिवेणी 

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदनातून मागणी 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानक ते भद्राचलम पर्यंत नियमितपणे चालणारी सिंगरेनी पॅसेंजर ही चार दिवसापूर्वी बंद करण्यात आलेली आहे. यामुळे आंध्र प्रदेश व तेलंगना राज्यात जाणाऱ्या तेलगू भाषिक नागरिकांची प्रचंड गैरसोय झालेली आहे.

तसेच सिकंदराबाद ते बल्लारपूर पर्यंत चालणारी भाग्य नगर एक्सप्रेस ही बंद झाली असून सध्या परिस्थिती ती केवळ कागज नगर पर्यंतच येत असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाश्याना प्रवासा करीता प्रचंड अडचणी येत असल्यामुळे सदर रेल्वे गाडया शुरु करण्यात याव्या याकरिता घुग्घूस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर महिला जिल्हा काँग्रेसच्या महासचिव पदमा त्रिवेणी यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची 04 सप्टेंबर रोजी भेट घेऊन सदर रेल्वे गाड्या शुरु करण्याची निवेदनातून मागणी केली आहे

याप्रसंगी संध्या मंडल, मंगला बुरांडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये