बेरोजगार युवकांच्या न्याय व हक्कासाठी जन आक्रोश मोर्चा
माणिकगड सिमेंट व अल्ट्राटेक माईन वर धडकणार मोर्चा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सुदाम राठोड यांच्या नेतृत्वामध्ये बेरोजगार युवकांच्या न्याय व हक्कासाठी बेरोजगार जन आक्रोश मोर्चा ४ सप्टेंबर २०२४ रोज बुधवारला सकाळी ११ वाजता माणिकगड सिमेंट कंपनी अल्ट्राटेक माईन्स येथे हा मोर्चा धडकनार आहे.या मोर्चाच्या प्रमुख मागण्या तालुक्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना शैक्षणिक पात्रेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.
आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा आसापुर, पेदाआसापुर, पांढरवणी व रामटेक गुडा लिंगनडोह (कुसुंबी) या सर्व गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्राला संरक्षण भिंत व भोजन कक्ष किचन शेड चे बांधकाम, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून देण्यात यावे. आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व गावांमध्ये सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून देण्यात यावे.व हाॅयमास लाईटची तात्काळ सोय करून देण्यात यावी. माणिकगड सिमेंट कंपनीने सर्व गावाला दत्त घ्यावे. आसापूर ग्रामपंचायत मधील युवकांचे आरोग्य चांगले व शरीर मजबूत राहण्यासाठी व्यायाम शाळा ची सोय करावी.
स्पर्धा परीक्षेमध्ये युवकांना भाग घेण्यात यावे म्हणून ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व गावात वाचनालय सुरू करण्यात यावे. या सर्व मागण्या घेऊन बेरोजगार जन आक्रोश मोर्चा करण्यात येणार आहे या बेरोजगार जन आक्रोश मोर्चामध्ये जास्तीत जास्त युवा पिढीने आपली उपस्थिती दर्शवावी असे आव्हान विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.