ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील धनगर समाजाला त्वरित घरकुलाचा लाभ द्यावा- डॉ .अभ्युदय मेघे यांनी मागणी 

जिल्हाधिकारी वर्धा यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

प्रधानमंत्री आवास योजनेतील पैसे गेले दोन वर्ष झाले लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नाही. यामुळे अनेकांचे घराचे काम प्रलंबित आहे. घरकुलाचे पैसे लवकर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी यावेळी डॉ. अभ्युदय मेघे यांनी केली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा केली. धनगर समाजाला अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल देण्यात येते. परंतु त्या घरकुलाचे पैसे अद्याप लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने अनेक लाभार्थी घरकुला पासून वंचित आहे. यावर आपण शासन स्तरावर चर्चा करून लवकरात लवकर यावे मार्ग काढावा अशी विनंती डॉ. मेघे यांनी जिल्हाधिकारी यांना केले.

यावेळी जिल्हाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ समाज कल्याण आयुक्त यांच्याशी फोनवर संवाद साधून संबंधित प्रकरणाचे लवकरात लवकर चौकशी करून प्रश्न मार्गी लावण्या सांगितले.

हा प्रश्न लवकर मार्गीने लागण्यास संपूर्ण जिल्ह्याभरातील धनगर बांधवांना सोबत घेऊन जिल्हाधिकरी कार्यालयावर भव्य आंदोलन उभा करणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या सोबत नितीन ढगे , सुधीर वडे, देविदास वडे, गणेश ठाकरे, रामभाऊ दूधबडे, मारोती भोंगाडे, सचिन भोंगाडे, दसरत वडे, सुरेश ढगे, अजाब ढगे, नामदेव पाटील, रामू तुमडाम, सुरेश ताकसांडे,अशोक भोंगाडे, अभय ढगे, हर्षल थूल, रमेश भोंगाडे, श्रीराम मढावी तसेच इतर गावातील मंडळी उपस्थीत होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये