ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शहरातील ट्राफिक विभाग गहाळ
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
बल्लारपूर :-शहरातील नवीन बसस्टॅण्ड चॊकात ये -जा करणारे प्रवासी व समोरच दोन बँक आहे या परिसरातील आत्ताच वेळेला महिलांची वर्दळ दिसून येते कारण मुख्यमंत्री लाडली बहीण चे बँक खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा झाल्याने या परिसरात गर्दी फार मोठ्या प्रमाणेत आहे आणि येथील ट्राफिक विभागातील एकही ट्राफिक पोलीस कर्मचारी हजर नसल्याने बँके कडे जाणाऱ्या रस्त्यावर छोटे -मोठे अपघात होतच आहे मोठा अपघात व्हायला वेळ लागणार नाही.
ट्राफिक पोलीस हजर नसल्याने शहरातील नागरिक रोष व्यक्त करीत आहे, त्यांचे म्हणे आहे की ट्राफिक विभागातील पोलीस गेले कोठे? हरविले तर नाही ना?