जिवतीत हर घर तिरंगा उपक्रम साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- येथील श्री व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था गडचांदूर द्वारा संचालित विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील राज्यशास्त्र विभाग, इतिहास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच तहसील कार्यालय यांच्या वतीने “आझादी का अमृत महोत्सव” संदर्भात तहसील कार्यालय येथील तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांच्या नेतृत्वा खाली “हर घर तिरंगा” हा उपक्रम सुरू केला आहे.
१२ ऑगस्ट ला विदर्भ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने आपल्या देशाचा तिरंगा फडकवण्यासाठी तसेच लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी “हर घर तिरंगा” या संदर्भात जिवतीत रॅली काढण्यात आली. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वज्या बद्दल जागरूकता वाढविणे हा या उपक्रमामागील संकल्पना आहे. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच प्रा. अमित बोरकर प्रा. डॉ. श्रीकांत पानघाटे प्रा. प्रफुल ताडाम प्रा.जयंत वासाडे प्रा. लक्ष्मण मंगाम यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन यनगंदलवार व राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. चतुरदास तेलंग यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि विदर्भ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.