तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या रजा आंदोलन मुळे शेतकरी हवालदिल
जिल्हा प्रशासन मात्र गाढ झोपेत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तलाठी यांच्या प्रस्तावित केलेल्या अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्या संदर्भात विदर्भ पटवारी संघ व मंडळ अधिकारी संघ, नागपूर, जिल्हा बुलढाणा यांनी जिल्हा अध्यक्ष विजेंद्र कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वात १८ जुलै पासून आंदोलन सुरू केले आहे.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटना ने विविध प्रकारचे आंदोलन केले. मात्र शासन गंभीर नाही असा आरोप केला आहे,
जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेल्याने गावगाड्यातील महसूली कामकाज ठप्प झाले असून लाडकी बहीण योजना साठी लागणारे दाखले, शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्न दाखले, पीक कर्ज प्रकरणासाठी लागणारे सात बारा, फेरफार व इतर कागदपत्रे मिळत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग व नागरिक त्रस्त झाले आहेत, शासनाचा सुरू असलेला महसूली पंधरवाडा तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विना केवळ नावापुरताच उरला आहे, सद्य परिस्थितीत शासनाचे ई पिक पाहणी, पीक कर्ज, शेतरस्ते, पंचनामे, तसेच इतर योजनांचे कामकाज प्रभावित झाले असून जनजीवन विस्कळित झाले आहे, अशा परिस्थीती मध्ये शेतकरी व सामान्य नागरिक चिंतातूर असताना जिल्हा प्रशासनाने कोणताही सकारात्मक तोडगा न काढल्याने जिल्हा प्रशासन गाढ झोपेत असल्याचे चित्र दिसून येत आहे,
आंदोलनाच्या प्रत्येक टप्पावर विविध सामाज माध्यमांनी व लोकप्रतिनिधींनी दखल घेतली असताना जिल्हा प्रशासनाने माञ फक्त बघ्यांची भूमिका घेतली आहे.
प्रशासनाने संघटनेच्या प्रतिनिधी ला लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारे चर्चेला बोलविले नसल्याची बाब समोर आली आहे, त्यामुळे आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहे, येत्या दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाने तोडगा न काढल्यास सदर आंदोलनाची व्याप्ती विदर्भ पटवारी संघ नागपुर चे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विदर्भात वाढविणार असल्याची माहिती विदर्भ पटवारी संघ बुलढाणा चे जिल्हा अध्यक्ष विजेंद्र कुमार धोंडगे यांनी दिली आहे.